गाथा पानिपतच्या प्रतिशोधाची..!
भाग 2

पोस्टसांभार : भूषण गर्जे,
( अलिजाबहद्दर महादजी राणोजी शिंदे सरकार; १७३०-१७९४)
२५ डिसेंम्बर, १७७१ बादशहाचा दिल्ली प्रवेश महादजींच्या नेतृत्वाखाली झाला व बादशहा पुन्हा एकदा तख्तावर बसला. तिथे महाराष्ट्रात मृत्यूशय्येवर असलेल्या श्रीमंत माधवराव पेशव्यांनी याबाबत मराठा सरदारांना व विशेष करून महादजींचे अभिनंदन करताना म्हंटले, "इंग्रजांस जी गोष्ट न जाहली ती तुम्ही सिद्ध करून असाधारण लौकिक मिळवला. इंग्रजांचा प्रवेश दिल्लीत होऊ नये. प्रवेश जालिया उखलणार नाही." असा इशारा द्यायलाही पेशवे विसरले नाही.
महादजींचा दरारा दिल्लीत वाढला. परंतु ते आता इथवर थांबणार नव्हते. त्यांनी झाबेतखानाच्या मुलूखवर हल्ला चढवला. तसा झाबेतखान पळत सुटला. शुक्रताल मराठ्यांच्या हातात आले. आता मराठी फौज आणि शाही फौज पत्थरगडकडे आली. हा किल्ला रोहिल्यांची राजधानी नाजीबाबादच्या पूर्वेला एक मैलावर नाजीबखान रोहिल्याने बांधला होता. मराठ्यांनी पत्थरगडला वेढा दिला. स्वतः बादशहा जलालाबादला आला होता. पत्थरगड बळकट किल्ला होता. तोफा आणि दारुगोळा मुबलक होता, परंतु अन्नसाठा कमी होता. गडावर फक्त बायका-मुले होती. अफगाण शेजारी असलेल्या तराईच्या जंगलात पळून गेले होते. पत्थरगडचा वयोवृद्ध किल्लेदार सुलतानखानचा आत्मविश्वास खचत चालला होता. शेवटी किल्ल्यातील बायकांच्या इभ्रतीला आणि किल्ल्यावरील लोकांच्या जीवितेला धक्का पोहोचू नये, ह्या अटीवर त्याने किल्ला मराठ्यांच्या हवाली केला. १६मार्चला पत्थरगड मराठ्यांना मिळाला. प्रत्येक अफगाणाची कसून झडती घेण्यात आली. मराठ्यांनी अफगाण स्त्रियांच्या अंगाला हात लावला नाही. पत्थरगडमध्ये मराठ्यांना खूप लूट मिळाली. मराठ्यांनी रोहिल्यांवर मोठा विजय मिळवला. ह्या विजयाचे शिल्पकार होते,
No comments:
Post a Comment