गाथा पानिपतच्या प्रतिशोधाची..!
भाग 3
पत्थरगडमध्ये नाजीबाची समाधी होती ती फोडून त्याची हाडे फेकून त्यांवर नाचणारे, साऱ्या अंगाला त्याची भुकटी फासून आनंद साजरा करणारे विसजीपंत बिनीवले,
आणि..
..अख्ख्या रोहिलखंडात जमिनीवर २ वीट ही बांधकाम असेल तर तोफा लावून उडवण्याची भीष्मप्रतिज्ञा घेतलेले महादजी शिंदे..!
दिल्लीवर नियंत्रण ठेवण्याच्या मराठ्यांच्या मान्सुब्यातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे नजीबखानचे खानदान. हे वैर मराठ्यांना तीन पिढ्या पुरले आणि तिन्ही पिढ्यांचे साक्षीदार होते स्वतः महाराजा महादजी शिंदे! अर्थात पानिपतच्या वेळी महादजींना नजीबाविरुद्ध फार काही करायची संधी मिळाली नाही. पण नजीबचा मुलगा झाबेत आणि नातू गुलाम कादिर यांचा पुरता नक्षा उतरवून त्यांना घुडघ्यावर आणले.
दिल्लीच्या बादशहाचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधीचे म्हणजे "वकिलीमूत्लक" पद पदरात पाडून त्याद्वारे सर्व हिंदुस्थानचा कारभार ताब्यात घेण्याचा गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्जचा कावा महादजींनी हाणून तर पडलाच, परंतु हे पद स्वतःच्याच पदरात पडून त्याचा डाव उलटवला. महाराजा महादजी शिंदे "हिंदुस्थानचे पाटील" बनले.
४ डिसेंम्बर १७८४ला बादशहाने भव्य दरबार भरवून साम्राज्यातील देण्यात येणारी सर्वश्रेष्ठ पदवी "वकील-इ-मुतालिक" श्रीमंत महाराजा महादजी शिंदे ह्यांना मोठ्या आनंदाने दिली आणि त्याच्या नंतर तब्बल २०वर्ष म्हणजे १८०३पर्यंत लाल किल्ल्यावर भगवा डौलाने फडकत राहिला.
वकील-इ-मुतालिक, सुरमा-ए-हिंद, सिपाह सालार, फतेह जंग, नायाब-ए-मरहट्टा, श्रीमंत महाराजा आजम अलिजाबहाद्दर महादजी शिंदे सरकार ह्यांनी दत्ताजी शिंदेंच्या हत्येचा आणि पानिपतच्या पराभवाचा कलंक धुवून टाकला. मराठी पराक्रम उत्तरेत निनादु लागला. कुठे पुणे, कण्हेरगड आणि कुठे उत्तरेतील पत्थरगड ? पण ह्या भीमथडी तट्टांनी गंगा-यमुनेचा प्रदेश जोरदार तुडवला. रोहिल्यांचा त्यांच्याच प्रदेशात घुसून परभाव केला.
धन्यवाद.


No comments:
Post a Comment