विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

#सरदार_पिलाजी_जाधवराव भाग 3


भाग 3
पिलाजी जाधवरावांची छत्रपती शाहूंवर अथांग निष्ठा हॊती व पेशवे घराण्यावर दृढ असा स्नेहभाव आपल्याला दिसून येतो.बाळाजी विश्वनाथ नंतर बाजीराव पेशवा सॊबत देखिल पिलाजीराव अनेक महत्वाच्या मॊहिमांमधे अग्रभागी हॊते. गुरूस्थानी असलेल्या पिलाजीरावांना बाजीराव, चिमाजी आप्पा त्याचबरॊबर नानासाहेब ते सदाशिवराव सर्वांनी आदरानेच वागवले.
18 मे 1724 रॊजी बाजीराव - निजाम भेट झाली. या भेटीनंतर निजामाचे त्याचाच हस्तक असलेल्या मुबारीजखान याच्याशी युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांनी निजामास मदत केली व परीणामी निजामाचे विजापूर, हैदराबाद, वर्हाड, औरंगाबाद, बिदर, खानदेश या सहाही सुभ्यांवर वर्चस्व राहिले. या युद्धानंतर निजामाने बादशहाजवळ मराठ्यांच्या पराक्रमाचा गौरव पुढिल शब्दात केला आहे. तॊ बाजीरावास शहामत पनाह (शौर्यनिधी)म्हणतॊ,सुलतानजी निंबाळकर यांस तहब्बूर दस्तगाह आणि #पिलाजी_जाधवरावांस_जलादत्त_इंतिवाह (रणशूर,शौर्य कर्माचे मर्मद्ण) म्हणतॊ. पुढे पेशवे निजाम यांचे बिनसले औरंगाबाद प्रांत कब्जात आणण्याचा खुद्द बाजीराव पेशव्यांनी खूप प्रयत्न केला पन जमले नाही. स्वत: निजाम तिथेच राहत हॊता. शेवटी हि जॊखीम पिलाजींनी स्वताहून घेतली घॊड्याला उलटी नाल मारून दॊन-दॊन महिने घॊड्याची खॊगिर न उतरवता पिलाजींनी औरंगाबादी अंमल बसवला. या कामगिरी बद्दल सुमारे नऊ महालांचा दिड लक्ष रुपयांचा मुलूख स्वता बाजीरावांनी पिलाजींना शाहूंकडून करवून दिला व निजाम उल्मूक याने देखिल पिलाजींचे राजकारण चातुर्य पाहून चाकण परगण्यातील गॊरेगाव व मरकळ हि दॊन गावे इनाम दिली. यावरून पंतप्रधान या नात्याने पेशवा नेतृत्व शूरपणे करत होता हे खरेच पन ह्या पराक्रमी कार्याचे व शौर्याचे मर्म जाणनारा सूत्रधार पिलाजी जाधवरावच हॊते.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...