रावरंभा निंबाळकर
भाग 3
तुळजाभवानीदेवीच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘सरदार निंबाळकर दरवाजा’ नाव दिले गेले तेही रावरंभावरूनच. अशा रीतीने सर्वच क्षेत्रांत नावाजलेल्या रावरंभाची कारकीर्द गाजली ती म्हणजे त्यांच्या कलासक्त स्वभावामुळे.
रावरंभा निंबाळकरांमध्ये रावरंभा खंडेराव अर्जुन बहाद्दुर हे एका नर्तकीच्या प्रकरणावरून फारच
गाजले. हैदराबादच्या निजामाची राजवट म्हणजे निव्वळ नबाबशाही. त्यामुळे नाचगाण्याचा थयथयाट झाला.
सातवा निजाम मीर उस्मान अली खानचे सहा विवाह झाले शिवाय इतर ४२ स्त्रिया जनानखान्यात होत्या. त्यातून त्याला ५० मुले व ४४ दासीपुत्र झाले. हे उदाहरण फार बोलके आहे. चमेली, बिजली, लैला यांसारख्या नर्तकी असायच्या. परंतु त्या कालखंडात हैदराबाद संस्थानात अतिशय प्रसिद्ध अशी नर्तकी आणि गायिका होती. तिचे नाव होते माहलिका ऊर्फ चंदा. तिच्या गाण्यावर निजाम, दिवाणापासून अनेक सरदार फिदा होते. परंतु माहलिकाची मर्जी होती ती रावरंभावर.
माहलिकाची बिदागी ही सर्वसामान्याला परवडणारी नव्हती. माहलिकाकडे स्वतंत्र कोठी असून रावरंभाकडून तिला प्रतिमाह तीन हजारांची बिदागी मिळत होती. अप्रतिम लावण्य, गायन आणि नृत्यात पारंगत असणा-या माहलिकाकडे गडगंज संपत्ती होती. गुलाम हुसेनखानाने ‘तारिखे-गुल्जारे आसफिया’ नावाच्या ग्रंथात रावरंभा आणि माहलिकाचा वर्णिलेला किस्सा मनोरंजक आहे.
१० फेब्रुवारी १७८२ ला पुण्यामध्ये सवाई माधवरावांचा शाही विवाह असल्याने देशभरातील राजा-महाराजांसह अनेक नामांकित लोकांनी हजेरी लावली होती. पूर्वी विवाह हे ३०-४० दिवस चालायचे.
शाही विवाहामध्ये तर नाच-गाणे, विविध खेळ, मनोरंजनाबरोबरच विविध बाजार भरायचे. नाच-गाण्याकरिता तर देशभरातील सुप्रसिद्ध नर्तकींनी आपली हजेरी लावली होती. त्या वेळी खरं तर सर्वत्र व्यंकटनरसी नावाच्या नर्तकीचा बोलबाला होता. परंतु महालिकेने सर्वांना मागे टाकत पुणे गाजविले. साहजिकच सर्वत्र माहलिकाची चर्चा झाली. लग्नसमारंभानंतर वराती मंडळी बाजारहाट करण्याकरिता बाहेर पडली.
मराठा कालखंडात बाजारात सर्वांत मोठी गर्दी ही घोड्याच्या बाजारात व्हायची. त्यानुसार नाना फडणीसासह अनेक नामांकित लोक या बाजारात फिरत असताना सर्वांची नजर ६ घोडे घेऊन आलेल्या व्यापा-यावर
स्थिरावली. अफगाणी जातीचे पांढरेशुभ्र घोडे खरंच
मोठे देखणे होते. नानामुळे तेथे मोठी गर्दी ही घोड्याच्या
बाजारात व्हायची. त्यानुसार नाना फडणीसांसह
अनेक नामांकित लोक या बाजारात फिरत असताना
सर्वांची नजर ६ घोडे घेऊन आलेल्या व्यापा-यावर स्थिरावली.
अफगाणी जातीचे पांढरेशुभ्र घोडे खरंच मोठे देखणे
होते. नानांमुळे तेथे मोठी गर्दी वाढली. थोड्याच वेळात घोड्याच्या खरेदीसाठी बोली लागली. शे- दोनशेचे घोडे पण नानांनी त्यावर दीड हजार लावले. अवास्तव किंमत आणि खुद्द नानांची बोली लागल्याने कोणीच पुढे आले नाही. बोली एकवार, दोनवार आणि तीनवार... व्हायच्या आत गर्दीतून आवाज आला दोन हजार रुपये.... सर्वांच्या नजरा आवाजाकडे वळल्या आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एका नर्तकीने पेशव्यांना मागे टाकून २ हजाराने ६ घोडे घ्यावेत हे आश्चर्यकारकच होते. न राहून नाना स्वत: माहलिकेच्या जवळ आले आणि त्यांनी तिला प्रश्न केला, तुला कशाला हवेत घोडे? तेव्हा माहलिकेचे उत्तर ऐकून सर्वांचेच डोके सुन्न झाले, कारण माहलिका म्हणाली, हे सर्व घोडे मी माझ्या प्राणप्रिय रावरंभासाठी घेतले आहेत.



No comments:
Post a Comment