विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

रावरंभा निंबाळकर भाग 4


रावरंभा निंबाळकर
भाग 4
पुढे माहलिका-रावरंभाचे संबंध अधिकच दृढ होत गेले. त्यामुळे तिच्यावर जळणा-यांनी अनेक कट-कारस्थाने रचून तिला देशद्रोही बनवून अटक करण्याचा प्रयत्न केला. परंतु निजामाने रावरंभाला जवळ बोलावून शहानिशा करून घेतली. रावरंभावर जिवापाड प्रेम करणा-या माहलिकेने रचलेल्या कविता पुढे प्रचंड गाजल्या. त्यातील काही पंक्ती किती बोलक्या आहेत.
‘हरम को बनाये है बल दैर दिल मेंŸ।
तुझे जबसे हम अय सनम देखते हैŸ।’
अशा या नामांकित माहलिकेने हैदराबाद या ठिकाणी इ.स. १८२४ साली रावरंभाचा आणि जगाचा निरोप घेतला. इकडे शंभर वर्षांहून अधिक काळ रावरंभा किताब मिळविणा-या या घराण्याचे दिवसही आता फिरले. इ.स. १८०० साली निजामाने इंग्रजांशी तह करून तैनाती फौज स्वीकारली. निजामाने दिवाणाला बडतर्फ करून सर्व संस्थानिक सरदार व जहागिरदारांना नाममात्र पगारीवर आणले.
साहजिकच जड अंत:करणाने आपले आवडते शहर हैदराबादचा निरोप घेतला. खड्र्याच्या लढाईमुळे अगोदरच करमाळा त्यांच्या ताब्यातून गेल्याने भूम येथे छोटीशी जहागिरी राहिली होती. शेवटचे वास्तव्य त्यांचे तेथेच असून इ.स. १८५७ साली रावरंभा खंडेराव अर्जुन बहाद्दर निंबाळकराने जगाचा निरोप घेतला. आज हैदराबादमध्ये माहलिकाची कबर तर भूम (जि.
उस्मानाबाद) येथे रावरंभाची समाधी आहे. पराक्रमी माणसाची कलाआसक्ती आणि निजाम व पेशवेकालीन स्त्री-पुरुष संबंधावर हा प्रकाशझोत आहे.
आजही माहलिकेचे प्रतीक म्हणून करमाळ्याच्या कमलादेवीच्या छबिन्यापुढे नाचण्याचा मान तिथल्या मूळ मुसलमान घराण्याकडे असून त्याकरिता इनाम जमीन आहे. निंबाळकर घराण्यात स्वकर्तृत्वाने पुढे आलेले रावरंभा हे एकमेव घराणे असूनही त्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळालीच नाही. परंतु आजही आपण करमाळा शहरात पाऊल ठेवलं की समोर त्यांनी बांधलेले कमलादेवीचे भव्य मंदिर दिसते आणि तोंडात या ओळी येतात-
करमाळं शअर काई वाजत जाई जाईŸ।
तिथं नांदती अंबाबाईŸ।।
करमाळं शअर... रावरंभाचं वतयन
महादेवाचा छबिना जातो मारोतीवरणंŸ।।
डॉ. सतीश कदम
मोबा. ९४२२६ ५००४४

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...