विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

बहमनी कालीन मराठे मनसबदार कामराज राजे घाटगे भाग 4

बहमनी कालीन मराठे मनसबदार कामराज राजे घाटगे
भाग 4
1)परसनाक :-
हे कामराज घाटगे यांचे प्रथम पुत्र होते.पराक्रमाने सरदार की मिळवली.ते मलवडी व बूध् येते जागीर पहात होते.
2)लोहनाक :-सरदार लोहनाक हे पराक्रमी होते. यांना सरदार कडतोजीराजे घाटगे हे पराक्रमी पुत्र होता.हा पराक्रमी वंश आहे.कडतोजीस चयाजी घाटगे हा पुत्र होता.
सरदार बालोजी घाटगे निजामशाहीत होते.मालोजी राजे यांचा मेहुणा वणगोजी निंबाळकरानी (बरा वजीरानचा काळ )आपली मुलगी बलोजी राजे -घाटगे यांना दिली.बलोजी हे मानसबदार कामराज घाटगे (खटाव मान )यांच्या वंशातील होते ,
1)"सरदार लोकंनाकराजे घाटगे" पुत्र
2)"सरदार कड्तोजिराजे घाटगे "पुत्र
3)"चयाजीराजे घाटगे" यांचा पुत्र होता
4) "सरदार बालोजीराजे घाटगे."
बलोजीस 7पुत्र होते.
1)सरदार कोरपाळजीराजे घाटगे
2)सरदार बाबाजीराजे घाटगे
3)सरदार यालोजीराजे घाटगे
4)सरदार लखोजीराजे घाटगे
5)सरदार कडतोजीराजे घाटगे
6)सरदार रहोजीराजे घाटगे
7) सरदार मिटाजीराजे घाटगे
या 7जनात भाडने लागली व्यागोजी राजे निंबाळकर व विजापूरच्या वजीर कालीमखांन मार्फत वाटनी केली.वडिलांशी शीकयासाठी 5गावे व प्रत्यक मुलास 11गावे वाटून आली.ही वाटनी ई स वी सन 1566ला केली.
जहागिरदार बाबाजी राजे घाटगे
सरदार बाबाजी घाटगे यांना झुंजारराव ही पदवी आहे व वजीरकी भेटली होती.विजापूरच्या राज्यांतून त्यानी पराक्रमाने कमावली होती.सरदार बालोजी घाटगे पुत्र सरदार बाबाजीघाटगे व सरदार मितोजी घाटगे हे विजापुर दरबारी फार नावारूपास आले होते.
निजामशाहीचा दिवाण मलिक कबरने यकदा विजापुरास हल्ला चड़वला तेव्हा विजापूर तर्फे सरदार बाबाजी घाटगे व त्यांचे घाटगे भावकि फार उपयोगी पडली होती.विजापुर वर प्रसंग तशाच होता.
मलिक कबरने विजापूरवर छापा घालून विजापूरचे सर्व वजीर पकडून घेऊन गेला.त्यात रणदुल्लखान ,वजीर मानसूरखान ,खेतरखान ,याकुतखान सूजयातखान ,रहमतखान ,जानोजी पाढरे व पदाजी खाटें असे नामांकित वजीर पकडून दुलताबादच्या किल्यावर वेड्यात घालून बंदी केल.तेव्हा विजापूरचे बादशहा हताश होत गेला.त्यच्या जवळ खवास खान नामक सरदार होता.त्याने व मुरार जगदेवयांनी व बाबाजी घाटगे यांनी बादशहास अर्ज करून नामांकीत शिलेदार व मनसबदार जमून मालिका वर हल्ला करण्याची परवानगी घेतली.त्या वेळी अनेक मराठा शिलेदार स वजीर कीची वस्त्रे प्राप्त होत गेली.त्यात 1)वजीर आबाजी पदाजी घाटगे
2)वजीर साबाजी घाटगे
3)वजीर बाबाजी घाटगे
4)वजीर काणोजी चव्हाण
5)वजीर छमवा घोरपडे या सर्व मराठा विरानी हल्ले चड़वून विजापूरचे सर्व वजीर जिवंत सुखरूप सोडवल्याचा पराक्रम केला होता.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...