विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 10 April 2020

श्रीमंत राजेजयसिंगराव रामसिंगराव जाधवराव (आण्णा )




श्रीमंत राजेजयसिंगराव रामसिंगराव जाधवराव (आण्णा ) ( १४ वे,वंशज श्रीमंत राजेलखुजीराव विठ्ठलदेवराव उर्फ विठोजीराजे जाधवरावआणि १० वे वंशज सरसेनापती धनाजीराव शंभुसिंह जाधवराव )

postsaambhar by :Raje Amarsingh Udaysingh Jadhavrao


जयसिंगराव यांच्या जन्म बोरगाव ( सातारा ) येथे झाला त्यांचे आजोळ कोरीवळे ( पाली )येथील मोहीते घराण्यातील वयाच्या १० वर्षी वडील श्रीमंत रामसिंगराव माधवसिंग राजेजाधवराव हे वारल्यानंतर त्याचे माळेगाव संस्थान ला दत्तक गेलेले चुलते श्रीमंत शंभुसिंहमहाराज यांनी माळेगावला १९१७ साली आणले. *कौटुंबिक माहिती आण्णाना दोन पत्नी होत्या मोठ्या पुतळाबाई ह्या पेरले येथिल श्रीमंत शंकरराव भोसले यांच्या कन्या आणि दुसऱ्या पदमावती त्याचे चे माहेर सातारा जिल्ह्यातील पिंपोडे येथील श्रीमंत साहेबराव नरसिंगराव निकम देशमुख यांच्या कन्या माहेरचे मुळनाव सिताबाई होते पुतळाबाई यांना दोन मुले१ श्रीमंत मानसिंगराव आणि २ श्रीमंत नवलसिंह असे पुत्र मुलीचे नाव सूशीलादेवी.ह्या फलटण ( निंबळक ) येथील श्रीमंत विठ्ठलराव राजेजीराव नाईक निबाळकराना दिलेल्या तर पदमावती ह्यांना ४ मुले आणि २ मुली होत्या१ विजयसिंह,२ चंद्रसेन३ उदयसिंह आणि ४ प्रतापसिंह आणि१ मुली चंद्रप्रभादेवी ह्या शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा श्रीमंत गोंविंदराव वामनराव कदम जहागीरदार ह्यांना दिल्या दुसर्या,कन्या २ कुमुदिनीदेवी ह्या अहमदनगर जिल्ह्यातील मुंगी पैठण येथील श्रीमंत नानासाहेब हरीश्चंद्रराव राजेभोसले ह्यांना दिल्या . तसेच जेष्ठ पुत्र विजयसिंह हे त्याचे चुलते श्रीमंत धनसिंगराव माधवासिंग राजेजाधवराव यांना दत्तक गेले आणि त्यांचे दत्तकनाव कृष्णसिंह असे ठेवले पण सर्वत्र आबाजीकाका म्हणुनच परीचीत होते "आण्णा आणि शंभुसिंहमहाराज यांचे व्दितीय पुत्र श्रीमंत चंद्रसेनमहाराज हे समवस्क होते त्याबरोबर त्यांचे शिक्षण झाले आण्णाचे मराठी, मोडी, भाषेव्यतीरीक्त इंग्रजी भाषा,देखील,अवगत होती. शिकाराची आवड असल्याने सतत श्रीमंत चंद्रसेनमहाराज ह्याच्याबरोबर नेहमी शिकारीस जात असत.आण्णाना राजकारभाराचे बाळकडु त्याचे चुलते श्रीमंत शंभुसिंहमहाराज यांच्याकडुन मिळाले आण्णा राजकारभारात महाराजाना,मदत करु लागले कालांतराने श्रीमंत शंभुसिंह महाराज हे जुना राजवाडा (अमररत्न निवास ) मधुन नवी बांधलेल्या (अमरबाग पॕलेस ) राजवाड्यात राहिला गेल्यानंतर आण्णा स्वतंत्र वाडा बांधुन राहु लागले * कौटुंबिक माहिती . * जरी आमचे आण्णा स्वातंत्र्यसैनीक जरी नसले तरी त्या काळातील बर्याच भुमीगत स्वातंत्र्यसैनीकाना,लपून,राहण्यास सर्वोपतर मदत केली . * आण्णाचे न्यायदानातील आणि प्रशासकीय कार्य - गावातील बरेचसे तंटे मिटवत असत कुळाच्या जमीनी.बरेच वाद मिटवले तसेच गुन्हेगारीला पण आळा बसविण्याचे काम.सुध्दा केले. आण्णाचे युवापिढीसाठीचे कार्य - आण्णानी गावात तालीम नव्हती त्यामुळे त्यांनी नविन तालीम स्वखर्चानी बांधली आणि कोल्हापुरवरुन खास कुस्ती आणि मल्लखांब शिकवण्यासाठी नामांकित नामदेववस्ताद यांना आणले मानधन स्वखर्चातुन देत असत तालिमीमुळे ,गावातील तरुणाना कुस्तीची गोडी लागली. बरेच मल्लसुध्दा घडवले ( १५ वर्षापुर्वी त्या वस्तादापुर्वी त्या, नामदेव वस्तादाचे त्यांच्या मुळगावी निधन झाले ) * आण्णाचे शिक्षण क्षेत्रातील कार्य - २१ सप्टेबर १९४२ साली त्यांचे चुलचे श्रीमंत शंभुसिंह महाराज यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे जेष्ठ पुत्र रत्नसिंहमहाराज हे,कारभार पाहु लागले गावात त्याकाळी शिक्षणाची सोय नव्हती जुन्या राजवाडा ( अमररत्न निवास )हा हायस्कुल दान दिला आणि हायस्कुलला " श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कुल " असे दिले ह्या,कार्यात पण आण्णानी मोलाचे योगदान होते दानपत्रावर साक्षीदार म्हणुन स्वाक्षरी आण्णाची होती आणि शिक्षण समितीवर पदाधिकारी म्हणुन.कार्य केले. त्याच शाळेत आमचे शिक्षण झाले ह्याचा देखील मला अभिमान आहे . गावात नुकतेच जुन्यावाड्यात शाळा भरु लागली पण मुलीसाठी शिक्षणाची सोय पुण्याशिवाय बिलकुल नव्हती त्यामुळे श्रीमंत रत्नसिंहमहाराजानी मुलीसाठी नवीन शाळा बांधुन,दिली आणि त्यांचे नाव ".आंनदीबाई जाधवराव,कन्या शाळा " असे ठेवले गावात,शाळा, मुलीची शाळा सुरु झाली त्याकार्यात देखील,आण्णाचा सहभाग होता .शिक्षणाचे वारे वाहु लागले . आण्णाच्या असे निदर्शनात आले की पंचक्रोशीतील तसेच बाहेर गावातील मुलाच्या शिक्षणाची सोय नाहि मग आण्णानी स्वता पुढाकार घेऊन स्वताच्या राहत्या वाड्याचा निम्मा भाग शाळेकरीता देऊन बोर्डिग चालु केले,आणि बाहेर गावच्या मुलाची,राहणे शिक्षणाची , जेवनाची सोय *एकाच ठिकाणी करुन दिली. * आण्णाचे सहकार क्षेत्रातील कार्य- - भारत स्वंतत्र झाल्यानंतर सहकाराचे वारे,वाहु लागले सावकारी पाशातुन शेतकर्याची सुटका करण्यासाठी १९५२ साली,".माळेगाव.विवीध कार्यकारी सोसायटी ".च्या स्थापनेत सुध्दा त्यानी पुढाकार घेतला आणि स्वता पदाचीआपेक्षा ,चेअरमन न,होता फक्त खास लोकाग्रहस्तव फक्त संस्थापक संचालक झाले . माळेगाव सहकारी कारखाना " च्या उभारणीत सुध्दा आण्णानी स्वताची ८ एकर जमीन:' त्याकाळी दान देऊन योगदान दिले .आण्णाचे कार्य सर्व क्षेत्रात असले तरी राजकारणापासुन दुरच राहिले . आण्णा माळेगावला राहत असले तरी मुळगाव बोरगांवची नाळ तुटु दिली तसेच मांडवे ( सातारा ) येथील शाखेतील त्याचे चुलते श्रीमंत आबासाहेब बाबासाहेब उर्फ बाजीराव राजेजाधवराव आणि श्रीमंत धनसिंगराव बाबासाहेब उर्फ बाजीराव राजेजाधवराव यांच्याशी नेहमी गाठीभेठी घेत आण्णाच्या बरेचश्या कार्यात त्यांचे ह्या दोन्ही चुलत्याचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन असायाचे आण्णा हे धार्मीक होते बोरजाईमातेचे ते निस्सीम भक्त होते ते यात्रा, होळी इतर सणाचे मानकरी ह्याचे,ते मानकरी ह्या नात्याने त्यांचे जाणे येणे चालुच होते होतेच ,आण्णाच्या शब्दाला गावकरी फार मानत,होते बरचसे वादविवाद आण्णा,मिटवत,असत गाव गावकर्याना कोर्टाची पायरी कधीही चढु,दिली नाही . बोरगावातील,बरीच जमीन दानधर्म केली. आण्णाचा मृत्यू ७ आॕगस्ट १९५७ साली माळेगाव येथे ह्दय विकाराच्या तीव्र धक्क्याने झाला . असे माझे आजोबा आण्णा दोन जिल्हातील कर्मभुमीत वावरलेले , संस्थान काळ पारतंत्र्य आणि , स्वातंत्रकाळ जवळुन पाहिलेले , दानशुर , सहकार , शिक्षण , कुस्तीक्षेत्र , धार्मीक कार्यात वाहुन घेतलेल्या आण्णाच्याकार्यास शब्दाकंन तुमचा नातु अमरसिंह

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...