विनोद जाधव एक संग्राहक

Friday 29 May 2020

गनिमीकावा न करता रणांगणात जिंकलेली लढाई

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या लढाई म्हटली की ती लढाई गनिमीकावा च समोर येतो कारण एव्हढ्यामोठ्या शत्रूला मूठभर सैनिक घेऊन तुटपुंज्या हत्यारांनी जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना गनिमीकाव्याचा वापर करावा लागत होता. परंतु शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना अशी एक लढाई आहे ज्यात मराठे अगदी समोरासमोर रणांगणात येऊन लढले आणि जिंकले सुद्धा ती म्हणजे ‘कांचनवारीची लढाई’.

छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा आग्र्याहून सुटून स्वराज्यात आले. तेंव्हा स्वराज्याची आर्थिक परिस्थिती जरा बिकट होती त्यात पुरंदरच्या तहामध्ये स्वराज्याचे २३ किल्ले तहामध्ये द्यावे लागले होते.

स्वराज्याची घडी पूर्वपदावर आणण्यासाठी यशस्वी मोहिमा काढाव्या लागणार होत्या. मोहीम म्हटलं की युद्ध आलं, युद्धासाठी दारूगोळा रसद हवी त्यासाठी स्वराज्यात खजिना मजबूत हवा होता. खजिना वाढवण्यासाठी ‘सुरत’ वर छापा टाकावा लागणार होता. शिवाजी महाराजांची ही दुसरी सुरत मोहीम होती. निर्णय पक्का झाला सर्वांनी मोहिमेची तयारी सुरू केली.

सप्टेंबर १६७० च्या सुमारास पंधरा हजारांच्या फौजेनिशी छत्रपती शिवाजी महाराज कल्याणला उतरले. मोहिमेवर जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी सुरत लुटीच्या बातम्या पेरल्या होत्या.

सुरत चा सुभेदार तयारी ने मराठ्यांना अद्दल घडवण्यासाठी साठी सज्ज असायचा. पण मराठे येत नसायचे. असं बऱ्याचवेळा सुरत वर छापा टाकण्याच्या बातम्या धडकू लागल्या. पण मराठे येतच नसे हे पाहून सुभेदार आता अश्या अफवांवर दुर्लक्ष करू लागला. आणि खरोखरच २ ऑक्टोबर १६७० रोजी महाराज सुरतेमध्ये हजर झाले.

लक्ष्मीपूजेच्या दिवशी लक्ष्मी प्रसन्न झाली, महाराजांना अंदाजे एक कोटींचा खजाना मिळाला. मिळालेला खजाना, पंधरा हजारांचे सैन्य आणि शेकडो घोडे, बैल वगैरे घेऊन महाराजांनी स्वराज्याची वाट धरली.

मुघल सैनिकांना हुल देत शिवाजी महाराज नाशिक जिल्यातुन सातमाळ पर्वत रांगेच्या आडोश्याने येत होते. या डोंगररांगेच्या दक्षिणोत्तर मोठी सपाट मैदाने आहेत. या भागात धोडप, कांचना, हातगड वगैरे किल्ले आहेत त्यापैकी बरेच मुघलांच्या ताब्यात आहेत. या रांगेतील ‘कांचनबारी किल्लाच्या आडोश्याने जाण्याचा मार्ग निवडला.

औरंगाबाद म्हणजे दक्षिणेचा सुभेदार होता औरंगजेबाचा मुलगा ‘शहजादा मुअज्जम’. याची महाराजांच्या प्रत्येक हालचालीवर नजर होती. त्याने बुऱ्हाणपूर चा सरदार दाऊदखान कुरेशी याला महाराजांचा समाचार घेण्याचे आदेश दिले.

प्रचंड सैन्य घेऊन दाऊदखान मुल्हेरच्या दिशेला निघाला. दाऊदखान येतोय ही बातमी मिळताच महाराजांनी मुल्हेरचा तळ उठवून दक्षिणेच्या दिशेने जायचं ठरवलं.

कसं ही करून सातमाळ ओलांडून स्वराज्यात जाणं गरजेचं होतं पण खजाना, सैनिक आणि घोडेस्वार यांना घेऊन जाणं थोडं जिकिरीचं होतं. युद्धजन्य परिस्थिती होती. 

महाराजांना स्वराज्य वृद्धी वाढवण्यासाठी खजाना गरजेचा होता आणि स्वराज्यासाठी सैनिक देखील. युद्धाच्या आदल्या रात्रीच महाराजांनी खजाना वाहणारे घोडे बैल आणि पाच हजार सैनिकानांना सप्तश्रृंगी च्या दिशेने हळूच एका तुकडी ला पाठवलं.

दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. युद्धाचं नेतृत्व स्वतः शिवाजी महाराजांनी केलं. सहा – तास चाललेल्या या तुंबळ युध्दात छत्रपती महाराजांसह, प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव, भिकाजी दत्तो यांनी मोठया धीराने पराक्रम गाजवला मोगलांवर चारही बाजूंनी हल्ला करुन मराठ्यांनी युद्ध जिंकलं. 

हे युद्ध स्वराज्याच्या अतिशय महत्वाचे असे होते. या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे, समोरासमोर झालेली व जिंकलेली अशी ही लढाई होती. या युद्धाची रणनीती अतिशय जबरदस्त होती. शत्रूच्या मुलखात जाऊन समोरासमोर निधड्या छातीने ही लढाई महाराजांनी केली. पुढे या भागातील सर्वच किल्ले स्वराज्य वृद्धीसाठी जिंकून घेतले.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...