#भाग_तिसरा :-
#गजाखिंड_रणकंदन
सकाळचा प्रहर चालू झाला होता . इकडे
बाजी आपल्या बांदल मावळ्यांना आपली योजना
सांगू लागले . कोण दरडीवर चढु लागलं , तर कोण
खालील दगडी गोळा करू लागले . पाच पन्नास मावळे
दरडीवर चढून मोठं मोठाले दगड गोळा करू लागले .
गोफणीसाठी लागणारे लहान दगडही जमा होऊ लागले .
काही जण खालील मोठाले दगड दोरीने वर उचलून
घेत होते . बघता बघता काही वेळातच मावळ्यांनी
मोठ्या अन लहान दगडांचे ढिगारेच्या ढिगारे जमा केले .
सगळ्यांनी सोबत आणलेल्या शेंगदाणे अन फुटाणे काम
करता करता बकाबक खाऊनही घेतले होते . जवळच ।
वाहत असलेल्या ओढ्यातील पाणी पिऊन अन विश्रांती
घेऊन मावळे ताजे तवाणे होऊ लागले अन माऱ्यासाठी
सज्ज झाले . बाजींनी सगळ्यांना आप आपल्या जागा
घेऊन शांत बसण्याची सूचना केली . सगळीकडे शांतता
पसरली होती . वातावरण अजूनही ढगाळच होते , त्यात
दाट झाड झुडपांचा परिसर असल्याने प्रकाशही कमीच
होता . आता सिद्दी मसूदचे सैन्य हळू हळू जवळ येत
असल्याचे आवाज येऊ लागले होते . बाजी , संभाजी
( राजांचे सख्खे मामा अचलोजी जाधव यांचा मुलगा ) ,
सिद्दी इब्राहिम सज्ज झाले होते . घोड्यांच्या दौडीचे अन
खिंकाळण्याचे आवाज क्षणाक्षणाला वाढू लागले होते .
सिद्दी मसूदचे पुढे आलेले पन्नास एक हशम
" दीन दीन , पकडो , मारो , काटो " म्हणत गजा खिंडीपाशी
येऊन पोहोचले होते . गजखिंडीत प्रवेश करायला काही
अंतरच बाकी असताना एवढा वेळ दबा धरून बसलेले
मावळे हातात गोफण गुंडे गोल गोल फिरवत हर हर
महादेवचा गजर करत सटासट दगडी त्यांच्यावर फेकू
लागले . एक एक हशम अचूक टिपला जात होता .
कुणाच्या टाळक्यात , कुण्याच्या चेहऱ्यावर , कुणाच्या
छताडात धडाधड येऊन दगडी बसत होती , त्यासरशी
एक एक हशम घोड्यावरून खाली कोसळत होता .
जर कोणी गोफणीच्या माऱ्यातून सुटून पुढे आलाच तर
तिरकामठा वाले मावळे त्याचा अचूक निशाणा साधत
होते . काही वेळातच तीस पस्तीस यवनांच्या फडशा
पडला होता . काही हशम जखमी होऊन , काही अर्धमेले
होऊन तर काही मृत्युमुखी होऊन पडले होते . कसेबसे
वाचलेले व मागेच थांबलेले दहा पंधरा हशम मागच्या
मागे पळून गेले . मावळ्यांनी त्या तीस पस्तीस यवनांचा
होता नव्हता सगळा माल पळवून आणला . घोडे , हत्यारे ,
अन बरच काही . घोडे मागच्या बाजूला नेऊन बांधून
ठेवले . पुन्हा गोफणीसाठी वापरलेले दगड , धनुष्याचे
तिरही गोळा केले गेले . अन पुन्हा एकदा सगळे लढाई
साठी सज्ज झाले .
या वेळी जास्त शत्रू सेना आली होती . चारशे
हशम असतील अंदाजे पण खिंडीची वाट चिंचोली
असल्याने सगळ्यांना एकाच वेळी घुसने अशक्य होते .
जस जसे सैन्य पुढे जायचे दगडांचा अन बाणांचा असा
वर्षाव व्हायचा की आदिलशाही सैन्याची त्रेधातिरपीट
होऊन जायची . बरेचशे सैन्य पुढे आले होते . त्यांची
मावळ्यांशी आमने सामने लढाई सुरू झाली . पण
मावळ्यांच्या रेट्यापुढे मसुदच्या सैनिकांचा काही निभाव
लागेना . सिद्दी मसुदही आता हट्टालाच पेटला होता .
" दीन दीन , पकडो , मारो , काटो " म्हणत गजा खिंडीपाशी
येऊन पोहोचले होते . गजखिंडीत प्रवेश करायला काही
अंतरच बाकी असताना एवढा वेळ दबा धरून बसलेले
मावळे हातात गोफण गुंडे गोल गोल फिरवत हर हर
महादेवचा गजर करत सटासट दगडी त्यांच्यावर फेकू
लागले . एक एक हशम अचूक टिपला जात होता .
कुणाच्या टाळक्यात , कुण्याच्या चेहऱ्यावर , कुणाच्या
छताडात धडाधड येऊन दगडी बसत होती , त्यासरशी
एक एक हशम घोड्यावरून खाली कोसळत होता .
जर कोणी गोफणीच्या माऱ्यातून सुटून पुढे आलाच तर
तिरकामठा वाले मावळे त्याचा अचूक निशाणा साधत
होते . काही वेळातच तीस पस्तीस यवनांच्या फडशा
पडला होता . काही हशम जखमी होऊन , काही अर्धमेले
होऊन तर काही मृत्युमुखी होऊन पडले होते . कसेबसे
वाचलेले व मागेच थांबलेले दहा पंधरा हशम मागच्या
मागे पळून गेले . मावळ्यांनी त्या तीस पस्तीस यवनांचा
होता नव्हता सगळा माल पळवून आणला . घोडे , हत्यारे ,
अन बरच काही . घोडे मागच्या बाजूला नेऊन बांधून
ठेवले . पुन्हा गोफणीसाठी वापरलेले दगड , धनुष्याचे
तिरही गोळा केले गेले . अन पुन्हा एकदा सगळे लढाई
साठी सज्ज झाले .
या वेळी जास्त शत्रू सेना आली होती . चारशे
हशम असतील अंदाजे पण खिंडीची वाट चिंचोली
असल्याने सगळ्यांना एकाच वेळी घुसने अशक्य होते .
जस जसे सैन्य पुढे जायचे दगडांचा अन बाणांचा असा
वर्षाव व्हायचा की आदिलशाही सैन्याची त्रेधातिरपीट
होऊन जायची . बरेचशे सैन्य पुढे आले होते . त्यांची
मावळ्यांशी आमने सामने लढाई सुरू झाली . पण
मावळ्यांच्या रेट्यापुढे मसुदच्या सैनिकांचा काही निभाव
लागेना . सिद्दी मसुदही आता हट्टालाच पेटला होता .
" कैसे है ये मन्हाट्टे . . पत्थर से जंग . . जाओ . . आज कुछ
भी हो जाये , उस शिवाजी को पकडना हि है हमे । "
भी हो जाये , उस शिवाजी को पकडना हि है हमे । "
आणखी शंभर एक हशम खिंडीत घुसले . काही
घोड्यावर तर काही समोर ढाली धरून . जेव्हा
गोफणीचा अन बाणांचा काही उपयोग होत नव्हता ,
तेव्हा मात्र मावळे जे दरडीवर मोठं मोठाले दगड होते
ते वरून खाली फेकून द्यायचे . एवढे मोठाले दगड
एकतर अंगावर किंवा डोक्यात बसायचे . कुणाची डोकी
फुटायची तर कुणी जागेवरच जायबंदी होऊन व्हीवळत
पडायचं . सगळीकडे हल्लकल्लोळ माजायचा . त्यातूनही
जर काही सैन्य सुटून पुढे आले तर संभाजी अन सिद्दी
इब्राहिमच पथक भाले घेऊन त्यांचा समाचार घायचं . ते
| दमले कि स्वतः बाजी आघाडी घ्यायचे . बाजींनी आता
। दोन्ही हातात दांडपट्टा चढवला होता . " हर हर महादेव "
" जय भवानी " च्या गजरात त्यांचा रौद्रवतार प्रकटला
होता . एक एक हशम सपासप कापला जात होता .
एकही शत्रू पुढे जायची हिम्मत करत नव्हता . अजूनही
दोनशे गनीम खिंडीतच होते . येताना तर चारशे होतो
मागे पाहावं तर काही जखमी , काहिंचे मुडदे पडलेले
तर काही जीव वाचवून मागे पळत होते . मसूदच सैन्य
आता लढाईसाठी खिंडीत प्रवेश करू धजावेना . तरीही
सिद्दी मसूद त्यांना पिटाळून लावत होता . अचानक ,
| सिद्दी मसूद अन त्याची सेना ज्या ठिकाणी थांबली
होती , दोन्हीही बाजूने " हर हर महादेव " , " जय भवानी "
चा गजर ऐकू येऊ लागला . सिद्दी मसूद अन सैन्याला
काही कळायच्या आत दोन्ही बाजूने सटासट दगडांचा
अन बाणांचा वर्षाव होऊ लागला . कुठून बाण येतोय ,
कुठून दगड येतोय काहीच कळेना . सैन्य जखमी होऊ
लागलं . सिद्दी मसुदही आता भांबावून गेला , ' नेमकं
शिवाजीकडे किती सेना आहे ? ' त्यांची पीछेहाट होऊ
लागली . हीच संधी साधून फुलाजी अन त्यांच्या बांदल
मावळ्यांनी मोठं मोठ्याने हर हर महादेव च्या आरोळ्या
ठोकत खिंडीकडे धाव घेतली . अगोदरच खिंडीत
घुसलेले चारशे पाचशे यवनी सैन्य आता दोनशे अडीचशे
च्या आसपास शिल्लक होते , मागून येणाऱ्या अचानक
हल्ल्याने त्यांची तर बोबडीच वळली .
घोड्यावर तर काही समोर ढाली धरून . जेव्हा
गोफणीचा अन बाणांचा काही उपयोग होत नव्हता ,
तेव्हा मात्र मावळे जे दरडीवर मोठं मोठाले दगड होते
ते वरून खाली फेकून द्यायचे . एवढे मोठाले दगड
एकतर अंगावर किंवा डोक्यात बसायचे . कुणाची डोकी
फुटायची तर कुणी जागेवरच जायबंदी होऊन व्हीवळत
पडायचं . सगळीकडे हल्लकल्लोळ माजायचा . त्यातूनही
जर काही सैन्य सुटून पुढे आले तर संभाजी अन सिद्दी
इब्राहिमच पथक भाले घेऊन त्यांचा समाचार घायचं . ते
| दमले कि स्वतः बाजी आघाडी घ्यायचे . बाजींनी आता
। दोन्ही हातात दांडपट्टा चढवला होता . " हर हर महादेव "
" जय भवानी " च्या गजरात त्यांचा रौद्रवतार प्रकटला
होता . एक एक हशम सपासप कापला जात होता .
एकही शत्रू पुढे जायची हिम्मत करत नव्हता . अजूनही
दोनशे गनीम खिंडीतच होते . येताना तर चारशे होतो
मागे पाहावं तर काही जखमी , काहिंचे मुडदे पडलेले
तर काही जीव वाचवून मागे पळत होते . मसूदच सैन्य
आता लढाईसाठी खिंडीत प्रवेश करू धजावेना . तरीही
सिद्दी मसूद त्यांना पिटाळून लावत होता . अचानक ,
| सिद्दी मसूद अन त्याची सेना ज्या ठिकाणी थांबली
होती , दोन्हीही बाजूने " हर हर महादेव " , " जय भवानी "
चा गजर ऐकू येऊ लागला . सिद्दी मसूद अन सैन्याला
काही कळायच्या आत दोन्ही बाजूने सटासट दगडांचा
अन बाणांचा वर्षाव होऊ लागला . कुठून बाण येतोय ,
कुठून दगड येतोय काहीच कळेना . सैन्य जखमी होऊ
लागलं . सिद्दी मसुदही आता भांबावून गेला , ' नेमकं
शिवाजीकडे किती सेना आहे ? ' त्यांची पीछेहाट होऊ
लागली . हीच संधी साधून फुलाजी अन त्यांच्या बांदल
मावळ्यांनी मोठं मोठ्याने हर हर महादेव च्या आरोळ्या
ठोकत खिंडीकडे धाव घेतली . अगोदरच खिंडीत
घुसलेले चारशे पाचशे यवनी सैन्य आता दोनशे अडीचशे
च्या आसपास शिल्लक होते , मागून येणाऱ्या अचानक
हल्ल्याने त्यांची तर बोबडीच वळली .
" या अल्ला , काफर आया , काफर आया , भागो
sssss "
sssss "
फुलाजी अन त्यांच्या मावळ्यांनी मागून अन बाजींनी
समोरून उरलेल्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला .
भयंकर रणकंदन माजले . बाजी अन फुलाजीचा
रौद्रवतार पाहून मसुदच्या सैन्य समोर यायला थर थर
कापू लागले . सहा साडे सहा फूट उंच धिप्पाड देह बाजी
अन फुलाजी दोन्ही हातात गरगर दांडपट्टा फिरवत शत्रू
सैनिकांना सपासप कापत सुटले होते . अंगावर झालेल्या
वारांनी कपडे कधीच लालेलाल झाले होते , मोठाले डोळे
अन भादरलेले डोके त्यावर रुळणारी लांब शेंडी असा
अवतार झाला होता दोघांचाही .
समोरून उरलेल्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला .
भयंकर रणकंदन माजले . बाजी अन फुलाजीचा
रौद्रवतार पाहून मसुदच्या सैन्य समोर यायला थर थर
कापू लागले . सहा साडे सहा फूट उंच धिप्पाड देह बाजी
अन फुलाजी दोन्ही हातात गरगर दांडपट्टा फिरवत शत्रू
सैनिकांना सपासप कापत सुटले होते . अंगावर झालेल्या
वारांनी कपडे कधीच लालेलाल झाले होते , मोठाले डोळे
अन भादरलेले डोके त्यावर रुळणारी लांब शेंडी असा
अवतार झाला होता दोघांचाही .
लढता लढता जर बाजी अन फुलाजी दिसले तर मसुदचे
सैन्य , " शेतान आया . . शेतान आया . . . . भागो । " म्हणत
पळत सुटायचं .
सैन्य , " शेतान आया . . शेतान आया . . . . भागो । " म्हणत
पळत सुटायचं .
सिद्दी मसुदही आता विचार करून वेडा व्हायची वेळ
आली होती . एवढे चार पाच हजार सैन्य असूनही केवळ
तीन चारशे लोक आपली वाट रोखून धरतात .
आली होती . एवढे चार पाच हजार सैन्य असूनही केवळ
तीन चारशे लोक आपली वाट रोखून धरतात .
" क्या शेतान है ये मरहट्टे . . कैसे कैसे लोग पाल रख्खे है
इस शिवाजीने । हटनेका नाम हि नहीं ले रहे । "
इस शिवाजीने । हटनेका नाम हि नहीं ले रहे । "
पुढील लेख उर्वरित भागात...
" जय जिजाऊ "
" जय शिवराय "
" जय शंभुराजे "
" जय शिवराय "
" जय शंभुराजे "
कथालेख :-
इतिहासाचा भंडारा
इतिहासाचा भंडारा
No comments:
Post a Comment