विनोद जाधव एक संग्राहक

Friday 29 May 2020

छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील पहिले शिल्प

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत. महाराष्ट्रासोबतच जवळ जवळ संपूर्ण भारतात कुठे ना कुठे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे पाहायला मिळतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प कधी व कुठे उभारले माहीत आहे का? 

छत्रपती शिवाजी महाराजांचे हे शिल्प उभारण्यात आले ते कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी या गावात या शिल्प उभारणी चा देखील एक रंजक इतिहास आहे. मल्लवा देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांच्या जिवंत असतानाच त्यांचे शिल्प आपल्या राज्यात साकारले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका नंतर महाराजांनी १६७८ साली दक्षिण दिग्विजय मोहीम काढली होती. ही मोहीम करून महाराष्ट्रात परत येत असताना त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी या छोट्या गढीस काही कारणास्तव वेढा घालण्यात आला वेढा घालण्याचं कारण नीट स्पष्ट होत नाही. ही गढी प्रभुदेसाई यांची होती या वेळी या वेढ्याचे नेतृत्व सरदार सखोजीराव करत होते. वेढ्याचे नेतृत्व सखोजीराव यांना सोपवून महाराज पन्हाळगडावर आले. 

काही कारणास्तव प्रभुदेसाई आणि सखोजीराव यांच्यात लढाई झाली. गढी छोटी असली तरी प्रभुदेसाई यांचे सैनिकानी कडवी झुंज दिली. या युद्धात प्रभुदेसाई धारातीर्थी पडले. तरी देखील ही गढी निकराने झुंज देत होती.

पती मारले गेल्यानंतरही प्रभुदेसाई यांची पत्नी मल्लवादेवी यांनी लढाई सुरूच ठेवली. त्यांनी अक्षरशः  पुरुषवेशाधारी स्त्री सैन्यही मैदानात उतरविले होते. मराठी सैनिकांसमोर आपला टिकाव लागू शकत नाही हे हेरून मल्लवा देवी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे तहाची मागणी केली.

तह करण्यासाठी स्वतः महाराज यादवाडजवळच्या आपल्या सैन्याच्या मुख्य छावणीत दाखल झाल्यानंतर मराठ्यांनी बेलवडीच्या सैन्यास माघार घ्यायला लावली. परंतु त्याचवेळी सरदार सखोजीराव यांनी युद्ध सुरू असताना काही स्त्रियांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांना जेंव्हा ही गोष्ट समजली तेंव्हा त्यांनी सखोजीराव यांचे डोळे फोडण्याची शिक्षा दिली.

मल्लवा देवी यांचा पराक्रम पाहून महाराजांनी मल्लवांना त्यांचे राज्य आणि आजूबाजूची चार गावं त्यांना मुलाच्या दूधभातासाठी परत केली. पती च्या मृत्यूनंतर ही ज्या पद्धतीने त्यांनी झुंज दिली त्याबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना सावित्रीबाई म्हणून गौरविण्यात आले.

त्यामुळे महाराजांची आठवण आपल्या गढीत कायम राहावी, यासाठी त्यांनी महाराजांचे दगडी शिल्प कोरले. या शिल्पात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह घोड्यावरून जात आहेत अस दिसत.

तर शिल्पाच्या दुसऱ्या भागात छत्रपती शिवाजी महाराज एका आसनावर बसले आहेत आणि त्यांनी मल्लामा देवीच्या मुलाला मांडीवर घेतले आहे ज्यात शिवाजी महाराज हातात वाटी असून ते त्या मुलाला मुलाला दूध पाजत आहेत. त्यासोबत समोरच दोन महिला देखील त्या शिल्पात आहेत. त्यापैकी एक स्वतः मल्लवा देवी या आहेत.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...