पेडगावचा शहाणा बहादुरखान कोकलताश !!
postsaambhar:
Raj Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ मध्ये स्वत:स राज्याभिषेक करवून घेतला त्यासमयी मोगलांचे दोन सरदार दिलेरखान आणि बहादुरखान हे मोगल साम्राज्याचे संरक्षण करत होते. यावेळी काही कारणास्तव औरंगजेब याने दिलेरखान यास उत्तरेकडे बोलावून घेतले होते त्यामुळे एकट्या बहादुरखानावर दक्षिणेतील जबाबदारी पडली. बहादुरखान हा पेडगाव येथे छावणी टाकून स्वस्थपणे चैन करत होता आणि महाराजांना ही संधी मिळाली व राज्याभिषेकानंतर काही दिवसातच मराठ्यांनी पेडगावी बहादुरखानाच्या छावणीवर हल्ला केला.
पहिल्यांदा २ हजार मराठा घोडदळाच्या पहिल्या तुकडीने खानाच्या छावणीवर हल्ला केला आणि खानाच्या सैन्यास आपल्या मागे ५० मैल दूर नेले व त्याचवेळी मराठ्यांच्या दुसऱ्या ५-७ हजार सैन्याच्या तुकडीने त्याच्या छावणीवर हल्ला केला. मराठ्यांनी या मोहिमेत जवळपास १ कोटी रूपये आणि २०० घोड़े स्वराज्यात सामील केले आणि छावणी जाळून टाकली..
मराठ्यांनी बहादुरखानाच्या पेडगाव येथील छावणीवर हल्ला केलेली इतिहासात नोंद असलेली तारीख आहे १५ जुलै १६७४
No comments:
Post a Comment