*स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ*
भाग १
शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक जेष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थात ६ जून १६७४ रोजी रायगडावर पूरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदीक पद्धतीने संपन्न झाला. शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि महाराज्यांनी स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात अनुक्रमे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज , छत्रपती थोरले शाहू महाराज, छत्रपती रामराजे , छत्रपती धाकटे शाहू महाराज, छत्रपती प्रतापसिंह महाराज व छत्रपती शहाजि महाराज स्वराज्याचे छत्रपती म्हणून विराजमान झाले. स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक स्वत: छत्रपती करत असत. अष्टप्रधान मंडळात कालांतराने काही बदल घडून नवी पदे उदयास आली. छत्रपतिंच्या स्वराज्याची राजधानी प्रथम रायगड नंतर जिंजी व सातारा अश्या प्रकारे काळाप्रमाणे बदलत राहिली . इ. स. १८४९ साली इंग्रज्यांनी सातार्याचे राज्य खालसा केले व मराठा साम्राज्याचा अस्त झाला. या लेखात आपण स्वराज्याचे छत्रपती आणि त्यांचे अष्टप्रधानमंडळ यांची थोडक्यात माहिती करून घेऊ.
*“प्रधान अमात्य सचीव मंत्री, सुमंत न्यायाधिश दिव्यशास्त्री, सेनापती त्यात असे शहाणा, अष्टप्रधानी नृप मुख्य राणा”।।*
अष्टप्रधानमंडळातील मंत्र्यांचे दरबारातील स्थान हे महाराज्यांनी निश्चित करून दिले होते . त्यानुसार सिंहासनाच्या उजवीकडे प्रंतप्रधान , पंत आमात्य , पंत सचिव , मंत्री यांनी असावे सिंहासनाच्या डावीकडे सेनापति , सुमंत , न्यायाधीश , पंडितराव यांनी असावे असे संकेत होते
No comments:
Post a Comment