मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Tuesday, 10 November 2020
#राजमाता_जिजाऊ
#राजमाता_जिजाऊ
जगात माणसे येतात जातात पण कर्तृत्ववान माणसेच कायम स्मरणात राहतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाबाई होय.
"शिवराज्याभिषेक सोहळा डोळ्यांनी पाहल्यानंतर ही माता धन्य झाली. जीवन जगण्याचा त्यांचा उद्देश पूर्ण झाला होता. शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर त्या पाचाड येथील वाड्यात राहत होत्या. तेथे त्यांनी अंथरूण धरले होते. तब्येत साथ देत नव्हती व अशातच राज्याभिषेक सोहळ्यानंतर १२ व्या दिवशी दि. १७ जून १६७४ रोजी राजमाता जिजाबाईंचा पाचाड येथे रात्री दोन प्रहरी म्हणजे बारा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला."
(संदर्भ- मराठी दफ्तर, रूमाल 1)
मातोश्री जिजाऊंचे जीवन धन्य झाले. राजमाता जिजाबाईचे जीवन म्हणजे मातृत्व, दातृत्व, नेतृत्व व कर्तृत्वाची साक्षात खानच होती. त्यांना उदंड आयुष्य लाभले होते. परंतु संपूर्ण आयुष्यभरात त्यांना कधीच उसंत मिळाली नाही. त्यांचे आयुष्य साक्षात सरिते (नदी) सारखे होते. जीवनातील अनेक वळणावर अनेक संकटांचा, आघातांचा सामना करित त्यांचे आयुष्य पुढे चालत होते. परंतु नदिच्या अमृत तुल्य जलाने जसे अनेकांची तृष्णा व भूक भागून त्यांच्या चेहच्यावर समाधान झळकते, तसेच राजमाता जिजाबाईंनी अनेक आघात झेलले परंतु त्यांच्यातील मातृत्वाने त्यांनी
आपल्या पदराने अनेकांचे डोळे पुसले, दातृत्वाने त्यांनी अनेकांच्या जीवनात प्रकाश आनला, त्यांच्यातील नेतृत्वाने अनेकांना मार्ग मिळाला व कर्तृत्वाने स्वराज्य उभे राहिले व त्यामुळे स्वराज्याचा नवा सुर्य प्रजेला पहायला मिळाला.
वीरपत्नी, वीरमाता या बाबतीत त्यांची बरोबरी करणारी स्त्री भारतात काय पण जगतात शोधून दुसरी मिळायची नाही! त्यांचे पतिप्रेम अनन्य साधारण होते. त्यांची सहिष्णुता, धैर्यशीलता, साहस, पतिव्रत्य, धर्मशीलता, संघटन कौशल्य, शासननिपुणता, न्यायप्रियता असे अनेक गुण त्यांच्यात होते. कोणकोणत्या गुणांचे कौतुक करावे ?
राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल गागाभट्ट शिवराजप्रशस्तीत म्हणतात,
कादंबिनी जगजीवन दान हेतु: । सौदा मिनीव सकलहि विनाशनाय ।
आलंबिनी भवति राजगिरे दिदानी। जिजा भिदा जयति शहाकूटुंबिनी सा ।
अर्थ- “मेघमालेप्रमाणे लोकांच्या जीवनास उपयुक्त होणान्या, विद्युल्लतेप्रमाणे सर्व शत्रूंचानाश करणार्या, राजगडावर सर्वाचे आश्रयस्थान होणात्या या शहाजींच्या पत्नीचा, जिजाचा विजय असो.”
Post by-: @maratha_riyasat
#maratha #marathi #maharashtra #jijamata #maratha96k #rajmatajijau #marathistatus #marathas #marathaempire #marathawarrior #marathahistory #shivajimaharaj #shivajimaharajhistory #मराठी #मराठा #इतिहास #history
Subscribe to:
Post Comments (Atom)
! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!
! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...

-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
महत्वकांक्षी महाराणी बाकाबाई ( डोंगरक्वीन ) श्रीमंत महाराणी बाकाबाई भोसले (१७७४-१८५८) या दुसरे राजे रघुजी भोसले यांच्या चौथ्या आणि आवडत्या...
No comments:
Post a Comment