विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 28 February 2021

शंभुराचांच्या बेखोफ पथकांनी औरंगजेबवर केले ला हल्ला....

 

गोवळकोंड्याचा वेढा सुरु असताना

शंभुराचांच्या बेखोफ पथकांनी औरंगजेबवर केले ला हल्ला....
अचानक ते आले .कुठून आले,कसे आले ते काहीच कळलं नाही तुंबळ लढाई उसळली.किशोरसिंग हाडा चे पुत्र रामनाथसिंह,हरीनामसिंह,किशोरसिंहाचा नातू केशरसिंह,मूहकमसिंह हे राजपूत वीर जिवाची बाजी लावून पाशहांचं रक्षण करू लागले.
पूर्ण जोषात असलेल्या मराठ्यांनी त्या सर्वांना ठार मारून त्यांचे ३०० लोक धरणीवर पाडले.
मग निजामुदिन खान हा सरदार आपले पुत्र मेहंदी अली,सुलतान अली व दोनशे पठाणाची कडवी तुकडी घेऊन पुढे झाला.मराठयांनी त्यांचीही
खांडोळी उडवली.
खुद्द पातशहा आता उगडा पडला.त्याच्या संरक्षणासाठी फार थोडे लोक शिल्लक राहिले .खर तर त्या दिवशी त्याच्या अंतच व्हायाचा .
पण ऐनवेळी गाजीउदीन फिरोजजंग कुमकेला धावला आणि मराठयांना माघार घ्यावी लागली.
इतक्या जवळून मृत्यूची जीवघेणी सळसळ पातशहांना कधी जाणवली नव्हती.शंभुराजांचं एक नवं नि भयंकर रूप त्याला दिसल.इतक्या
राजांनशी शत्रुत्व केलं .पण कुणी आजवर जिवावर उठायचं धाडस केलं नव्हतं..

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...