विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 28 February 2021

छत्रपति संभाजी राजे ह्यांनी समुद्रावरचं आरमार बळकट केलं

 



छत्रपति संभाजी राजे ह्यांनी समुद्रावरचं आरमार बळकट केलं ह्याची नोंद मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रज ह्यांना एका पत्रात लिहिलेले आढळते -- १६ मे , १६८२
छत्रपति शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराचा पाया रचला आणि तो बळकट पण केला आणि स्वराज्याचे निशाण समुद्रावर दिसू लागले. जे शिवरायांचे धोरण तेच धोरण संभाजी महाराजांनी सुरू ठेवले.
१६ मे १६८२ मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना लिहिलेले पत्र - संभाजी महाराजांजवळ ८५ गलबते , ५,००० माणसे , मायनाक भंडारी ह्यांचा मुलगा स्वता संभाजी महाराजांच्या सेवेसी आहे. छोट्या होड्या वगळून ५८ मोठ्या युद्धनौका , ५,००० सैनिकांचे तळ , ३० ते १५० टनांची मोठी गलबते , ३ शिडींची गुराबे इतकी आरमारी ताकद उपलब्ध आहे.
( ह्या वरून कळतं संभाजी महाराजांनी राज्यकारभारात सुरवातीपासून आणि आरमारी शक्ती वाढवण्यास लक्ष दिले)
Ref - Mumbai - Surat Records
- अमित राणे

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...