विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 22 January 2022

जैतुगीदेव,

 जैतुगीदेव,

पोस्तसांभार :शंतनू जाधव 



जैतुगीदेव, ज्यांना जत्रपाल म्हणूनही ओळखले जाते, ते भारतातील दख्खन प्रदेशातील सीना (यादव) राजवंशाचे शासक होते. त्याने काकतीय साम्राज्यावर यशस्वीरित्या आक्रमण केले आणि त्यांना यादवांचे अधिराज्य स्वीकारण्यास भाग पाडले.
त्याचे वडील भिल्लमदेव यांच्या कारकीर्दीत, जैतुगीने कल्याणच्या आणि देवगिरीवर कब्जा करण्याच्या शत्रूच्या प्रयत्नांना प्रतिकार करत, होयसला राजा बल्लाळ II विरुद्ध त्याच्या वडिलांच्या युद्धात भाग घेतला. भिल्लमदेवाला शेवटी होयसलांविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. कमकुवत सेन शक्तीचा फायदा घेत, काकतीयांनी यादव साम्राज्याच्या पूर्व भागावर आक्रमण केले. काकतीय जनरल महादेव यदुवंशी, गर्वपद शिलालेखाद्वारे प्रमाणित केल्याप्रमाणे, क्षत्रिय मराठ्यांची राजधानी देवगिरी येथे पोहोचले. तीन राजवंश - यादव, होयसला आणि काकत्या - कल्याणीच्या चालुक्यांचे पूर्वीचे सामंत होते. यादवांनी स्वत: ला चालुक्यांचे खरे उत्तराधिकारी मानले आणि म्हणूनच काकतीयांनी त्यांचे वर्चस्व ओळखले पाहिजे अशी अपेक्षा केली.
एकदा यादव-होयसला संघर्ष शांत झाला आणि यादव शक्ती स्थिर झाली,
1194 मध्ये गझनीचा सुलतान घियाथ अल-दीन मोहम्मद याने मोहम्मद घोरीला महाराष्ट्रावर हल्ला करण्यासाठी पाठवले, चक्रवर्ती जैतुगीदेव महाराज तेव्हा काकत्याशी लढायला जात होते. मग त्याला माहिती मिळाली की "महंमद घोरीने महाराष्ट्रावर हल्ला केला आहे." मग चक्रवर्ती जैतुगीदेव महाराज स्वतः मोहम्मद घोरीशी लढायला निघाले आणि त्यांचे सामंत खानदेशचे सुभेदार सोमनाथराव काकत्याशी लढण्यासाठी निघाले, चक्रवर्ती जैतुगीदेव महाराजांनी लढाईत मोहम्मद घोरीचा पराभव केला. आणि सुभेदार सोमनाथरावांनी काकाट्यांचा लढाईत पराभव केला.
यानंतर मोहम्मद घोरीने महाराष्ट्रावर तीनदा हल्ला केला, 1195, 1196 आणि 1197 मध्ये, जेव्हा जेव्हा त्याने महाराष्ट्रावर हल्ला केला तेव्हा महाराज जैतुगीदेवने त्याला महाराष्ट्रातूण पळून लावले होते.
रुद्रला त्याचा भाऊ महादेव याने गादीवर नेले, ज्याचा मुलगा गणपतीला मराठ्यांनी युद्धात कैद केले. काही वर्षांनी (शक्यतो 1198 मध्ये) मराठ्यांविरुद्धच्या लढ्यात महादेवही मारला गेला. जैतुगीने काकतीय प्रदेश आपल्या थेट राजवटीखाली आणण्याचा प्रयत्न केला, पण तसे करण्यात त्यांना अपयश आले. म्हणून, 1198 च्या सुमारास, त्याने गणपतीला सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याला काकतीय साम्राज्यावर सेन सामंत म्हणून राज्य करू दिले. असे दिसते की गणपती आयुष्यभर मराठ्यांशी एकनिष्ठ राहिले.
३१ ऑगस्ट इ.स.१२००
वयाच्या पस्तीसाव्या वर्षी महाराज जैतूगीदेव यांचे निधन झाले.
जैतूगीदेव हे महाराज चक्रवर्ती सिंघणदेव यांचे वडिल जैतूगीदेव होते. तर आजोबासाहेब भिल्लमदेव हे चालुक्यांचे सामंत होते. महाराज भिल्लमदेव यांनी ११८७ मध्ये स्वतःला स्वतंत्र घोषित करुन सेऊन साम्राज्याची स्थापना केली, त्यांनी ११८७ मध्ये देवगिरि येथे किल्ला बांधला आणि देवगिरिला आपली राजधानी बनवली, ११८८ मध्ये त्यांनी गझनीचा सुलतान घियथ अल-दीन मुहम्मदचा सेनापती महम्मद गोरी याला महाराष्ट्राच्या सीमेवरुन पिटाळून लावले होते. त्यांनी ११८७ - ११९१ पर्यंत महाराष्ट्रवर राज्य केले होते, ११८९ मध्ये त्यांनी सूरातूर येथे झालेल्या लढाईत होयसळ शासक बल्लालाचा पराभव केला होता, ११९१ मध्ये ते युद्धात बल्लाल सोबत लढता लढता विरगतित मरण पावले होते. त्यांच्या नंतर त्यांचे पुत्र महाराज जैतूगीदेव हे राजे झाले, त्यांनी ११९१-१२०० पर्यंत राज्य केले होते. तिथे दुसरी कडे उत्तर भारतात मोहम्मद गोरीने घियथ अल-दीन मुहम्मद याच्या साठी ११९२ मध्ये निर्णायकपणे अजमेरचे सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला, मंग यानंतर त्याने कनैजचा राजा जयचंद याचा पराभव केला, असे करुन घुरीड वंशाचे वर्चस्व भारतात प्रस्थापित झाले, यानंतर ११९४ मध्ये गझनीचा सुलतान घियथ अल-दीन मुहम्मद याने मोहम्मद गोरीला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले, मोहम्मद गोरी याने माळवा आणि गुजरात हे दोन राज्य काबीज करत महाराष्ट्रावर आक्रमकण केले, तेव्हा महाराज जैतूगीदेव यांनी त्याला महाराष्ट्राच्या सीमेवरुन पिटाळून लावले.
यानंतर मोहम्मद गोरीने तीन वेळा महाराष्ट्रावर स्वारी केली, ११९५ मध्ये, ११९६ मध्ये आणि ११९७ मध्ये, त्याने जेव्हड्या वेळा महाराष्ट्रावर स्वारी केली तेव्हढ्याच वेळा महाराज जैतूगीदेव यांनी त्याला पिटाळून लावले होते. महाराज जैतूगीदेव वारंगळचा राजा महादेव याच्या सोबत युद्ध करण्यासाठी वारंगळला गेले, त्यांच्या सोबत युवराज सिंघणदेव सुध्दा गेले होते, तेव्हा ते १२ वर्षाचे होते, महाराज जैतूगीदेव यांनी वारंगळ येथे महादेव सोबत युद्ध केले, युद्धा मध्ये महाराज जैतूगीदेव सोबत युवराज सिंघणदेव शत्रूंशी धैर्याने लढत होते, या युद्धात महाराज जैतूगीदेव विजयी झाले, आंध्र हे राज्य आता सेऊन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले. यानंतर ३१ ऑगस्ट १२०० मध्ये वयाच्या पस्तीसाव्या वर्षी महाराज जैतूगीदेव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराज सिंघणदेव वयाच्या १५ व्या वर्षी सेऊन साम्राज्याचे चक्रवर्ती झाले
 

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...