विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 8 February 2022

॥ नरवीर तानाजी मालुसरेंचे एक अपरिचीत युध्द. ॥


 ॥ नरवीर तानाजी मालुसरेंचे एक अपरिचीत युध्द. ॥

तानाजी मालुसरे असे नाव घेतले कि लगेच आपल्याला त्यांच्या सिंहगडावर केलेल्या पराक्रमाची आठवन होते. सर्व सामांन्यांसाठी त्यांचे चरित्र या एकट्या प्रसंगापुरतेच मर्यादित झाले आहे. परंतु त्यांनी इतर केलेल्या पराक्रमांविषयी सर्व सामांन्यांना अजीबातच माहिती नाही. तानाजी मालुसरेंचे संगमेश्वरचे युध्द हे असेच अपरिचीत युध्द आहे, ज्या युध्दाला हवे आहे तेव्हडे महत्व देऊन लेखकांनी जगासमोर मांडले नाही. हा तानाजींवर झालेला अन्यायच आहे.
संगमेश्वरी असतांना शत्रुंनी केलेल्या अकस्मात हल्ल्या दर्म्यान तानाजींनी कमालीचे धाडस दाखविले होते. त्या प्रसंगाचे तपशिलवार वर्णन पुढिल प्रमाने_
दाभोळ, चिपळून, संगमेश्वर काबीज झाले, राजापुर लुटले गेले. ह्या बातम्या धडा-धड आदिलशाहाच्या कानावर आदळत होत्या. तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला. त्याने लगेच श्रूंगारपुरच्या सुर्याजीस आदेश केला. तो त्याला म्हणाला_ "तो (शिवाजी राजे) आमचा उघड शत्रु राजापुरवर चालुनजात असतांनाहि त्यास तु का अडविले नाही? असो ते जाउदे तो आता प्रत त्याच मार्गाने जवळ आला आहे. तेव्हां त्यास तेथे अडव (त्याच्याशी युध्दकर). आदिलशाहाने आशा प्रकारचा आदेश सुर्याजीला करताच हे काम अतिशय कठिण असतानांही सुर्याजीने करण्याचे धाडस दाखविले. आदिलशाहाच्या दबावाखाली सुर्याजीने शिवरायांविरोधात उघड-उघड शत्रुत्व धारण केले.
तेव्हां सुर्याजीं सुर्वे श्रूंगारपुरला होता त्याने लगेच शिवाजी राजांच्या संगमेश्वरी असलेल्या सैन्यावर धावा बोल्ला. संगमेश्वरी शिवरायांचे सैन्य अल्पसे होते. या अल्पशा सैन्याला सुर्याजीच्या सैन्याने चोहो बाजुंनी घेरले. शिवरायांच्या या सैन्याचे नेत्रुत्व तेव्हां पिलाजी निळकंठरावांकडे होते. आपले सैन्य शत्रुंनी चोहो बाजुंनी घेरले आहे, असे जेव्हां पिलाजींना समजले तेव्हां पिलाजीं फ़ार भयभीत झाले. शत्रुंना सामोरे जाऊन त्यांच्याशी युध्द करण्यापेक्षा युध्दातुन पळून जानेच त्यांनी योग्य समजले. ते आपला जीव वाचवण्याच्या भितीने संगमेश्वरहून पळुन जाऊ लागले. तोच भितीने कापणात्या त्या पिलाजीला आपल्या लोकांनामागे सोडुन पळुन जातांना तानाजी मालुसरेंनी पाहिले. तानाजीं सारख्या प्रतापि पुरुशाला हे अजिबात खपनारे नव्हते. तानाजींनी भ्याड पिलाजींना पळतांना पाहताच त्यांचा पायीच पाठलाग करून त्यांना हातात धरेले आणि त्यांचा उघड धिक्कार केला. तानाजी मालुसरे पिलाजीस म्हणाले_ "या युध्दात मी तुझा साह्यकर्ता आहे. तु आपल्या लोकांना संकटात टाकूण पळून जातोयस... हि खरच खेदाची गोष्ट आहे. आजपर्यंत तु तुझ्या प्रराक्रमांच्या एवढ्या बढाया मारत होता त्या सगळ्या बढाया कुठे गेल्या? ज्या शिवाजी महाराजांनी तुला मोठेपण (संम्मानाची जागा) देऊन सांभाळले. तु त्यांचा सरदार असतांनाहि सैन्य टाकुन स्व:तच पळुन जातोयस? आणि याची तुला खंतही वाटत नाही...." असे कित्येक कठोर शब्द बोलुन तानाजींनी पिलाजींना कैद केले. पिलाजीं घाबरलेले पाहुन तानाजींना वाटले पिलाजींची हि दशा पाहुन इतरही मावळ्यांची हिंमत खचेल, त्यामुळे पिलाजींना मोकळे सोडण्यापेक्षा कैदेतच ठेवणे योग्य असा विचार करुन तानाजींनी पिलाजीला जवळच असलेल्या एका दगडाला दोरखंडाने बांधुन ठेवले. पिलाजींना दगडाला बांधुन ठेवल्यान्नंतर तानाजी मालुसरेंनी स्व:तच सैन्याचे नेत्रुत्व केले.
ताजाजी मालुसरेंनी पिलाजी निळकंठराव सुभेदार यांना एका दगडाला दोरखंडांनी बांधुन ठेवल्यानंतर प्राणाचा किंचितही मोह नसलेल्या तानाजींनी व त्याच्या सोबती मावळ्यांनी शत्रुंवर जोरदार हल्ला चढवला. तानाजीं शत्रुंवर चालकरुन जातांना शत्रुंनीही तानाजींस रोखण्याच्या द इशेने पुढे सरसाव केला. आता दोन्ही सैन्य एकमेकांना भिडनार आणि रक्तताची त्राही त्राही होणार तोच मराठ्यांच्या मागच्या तुकडीने तानाजींच्या सक्षणासाठी शत्रुंवर बाणांचा वर्षाव केला त्यामुले तानाजींच्या समोर येणारी शत्रुची तुअकडी घायाळ झाली आणि याचा फ़ायदा उचलत तानाजींच्या नेत्रुत्वाय्खाली मावळ्यांनी शत्रुची दाणा- दाण उडवली. तानाजींची मागची तुकडी शत्रुंच्या पुढे सरसावणार्या तुकड्यांवर बाणांचा वर्षाव करी व बाणांनी जखमी झालेल्या शत्रुंच्या सैन्याला तानाजीं व सोबती मावळे कापुन काढित. मावळ्यांनी तानाजींच्या नेत्रुत्वाखाली शत्रुंशी रात्रभर झुंज दिली व शत्रुंच्या हातपाय कापलेल्या व धडापासुन मंडके वेगळे पडलेल्या शवांचे ढिगच्या ढिग मावळ्यांनी रनांगणांत रचले. शेवटी सुर्याजीला या युध्दात मोठे नुकसान सोसावे लागले. त्याला त्याच्या सैन्याची सर्वत्र दशा झालेली दिसताच ताने युध्दातुन पळ काढला. शेवटी वीर तानाजी मालुसरेंचा व सोबती मावळ्यांचा या युध्दात विजय झाला.
संदर्भ :- शिवभारत.
वरील दिलेल्या चित्रात दगडाला बांधलेला व्यक्ती हा पिलाजी निळकंठराव आहे व हातात तलवार घेतलेली व्यक्ती वीर तानाजी मालुसरे आहेत.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...