विनोद जाधव एक संग्राहक

Monday 31 October 2022

फर्जंद शहाजी राजे भाग १

 

फर्जंद शहाजी राजे
पोस्तसांभार ::आशिष माळी

भाग १
फर्जंद शहाजी राजे हे अत्यंत कर्तबगार असून त्यांना संधी मिळाली नाही. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाच्या मुळाशी जा,तिथं तुम्हाला शहाजीराजे दिसतील.पुत्राचा भाग्यविधाता पिताच असतो.बाकी आमच्याकडे उलटा विचार करायची पद्धत आहे हा भाग वेगळा,तसंही शहाजीराजे या नावाची ऍलर्जी आमच्यासाठी नवीन नाही. आदिलशहाचा नोकर हीच त्यांची ओळख.
शहाजी महाराजांनी निझामाच्या मुर्तझाला सत्तेवर बसवून कारभार हाती घेतला . अशा रीतीने त्यांनी कारभार चालावंला . तिन्ही शाह्या फिरून पूर्ण हिंदुस्थान मध्ये आपला वचक निर्माण केला . दुर्दैवाने पुन्हा संधी मिळाली नाही
चाकोरी बाहेर जाऊन विचार केला तर कळेल स्वराज्याचा पाया हा शहाजीराजे ह्या महान राष्ट्रपुरुषाच्या बुलंद खांद्यांवर मजबूत उभारला गेला आहे....आपल्या असे वाटते की शहाजी राजे यांची ओळख केवळ आदिलशाहीचा सेवक यापलीकडे काहीच नव्हती.शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा एक मोठा व्यापक कल्पना मांडली तो शहाजी महाराजांच्या डोळ्यातलीच.
जयराम पिंड्ये या कवीनेे तर म्हटले होते की, ‘‘इत साहजु है; उत साहजहॉं’’
पृथ्वीचे रक्षण दक्षिणेत शहाजी आणि उत्तरेत शहाजहान करीत आहे.
शहाजीराजे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील दुर्लक्षित व्यक्तिमत्त्व. आमच्या इतिहासकारांच्या दुर्लक्ष पणामुळे त्यांना न्याय मिळाला नाही.
  • शहाजी महाराज मलिक अंबर कडून गनीम कावा शिकले शिकले . पण भातवडी मलिक अंबर नेतृत्वाखाली निझामाने मुघल आदिलशाही हरवले .
  • . निझाम शाही ला वाचवायला मलिक अंबर शहाजहानने दक्षिणेमध्ये अनेक हल्ले केली हि आक्रमणे १६१५ ते १६२१ या दरम्यान.
  • शहाजहानचे दक्षिणेमध्ये आदिलशाही , कुतुबशाही आणि अहमदनगरची निझाम शाही(हैद्राबादची निजामशाही नाही )यांच्याशी लढत होती . दक्षिणेकडचे छोटे छोटे अनेक हिंदू राज्य पण त्यांच्या डोळ्यात सलत होतीच . नीजामशाही सरदार मलिक अंबर याने कुतुबशहा व आदिलशहा आणि ठिकठिकाणचे मराठे आणि इतर लोक एकत्र केले. मलिक अंबर गनिमी कावा चा गुरु . मलिक अंबरने ब-हाणपूरलासुद्धा वेढा घातला. ब-हाणपूर वाचवण्यासाठी तेथील मोगल सुभेदार खान खूप वेळ लागले. मलिक अंबरने गनिमी काव्याचे सर्वाना प्रशिक्षण देऊन मांडू पर्यन्त धडक मारून मुगलांना चांगलेच मुसंडी काढले .त्याने नगर ते बुऱ्हाणपूर मध्ये युद्धक्षेत्र लांबवले . या मलिक अंबर आफ्रिकन हबशी माणसाने मराठ्यांना गनिमी काव्याची देणगी दिली असे खूप इतिहासकारांचे मत आहे.शहाजीराजांची प्रतिष्ठा, पराक्र‘म व मुत्सद्दीपणा या गोष्टी सिद्ध झाल्या. गनिमी काव्याची लढाई ही किती उपयुक्त आहे हे भातवडीच्या लढाईने सिद्ध केले. गनिमी काव्याचा तो श्रीगणेशा ठरला व पुढे मराठेशाहीत उपयोगी ठरला.शहाजी महाराजांच्या दैदिप्यमान यशापुढे ढे स्वतः मलिक अंबर असुरक्षित झाला. इतकेच काय शहाजी महाराजांचे चुलत भाऊ पण त्या यशापुढे जळत होते

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...