मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Wednesday, 25 January 2023
महादजी शिंदे : भाग १
महादजी शिंदे : भाग १
राणोजींची राजपूत पत्नी चिमाबाई हिच्या पोटी जन्माला आलेले महादजी हे राणोजी शिंद्यांचे कनिष्ट पुत्र होते. १८ जानेवारी १७६८ रोजी महादजी शिंदे वयाच्या चाळीशीत गादीवर आले ते १७९४ पर्यंत वयाच्या सत्तरीपर्यंत आपल्या अतुल्य पराक्रमाच्या जोरावर सत्तेत राहिले. शिंदे होळकरांनी पुढे इतिहास घडवला. नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले दोन बंधू मृत्युमुखी पावले म्हणून महादजींनी त्याचा निर्वंश करायची शपथ घेतली होतीआणि ती पूर्णत्वास नेली नजीबाची राजधानी घौसगढ महादजींनी जमीनदोस्त केली..आणि नजीबाची कबर फोडून त्याचे प्रेत जाळले..नराधम नजीबाचा नीच नातू गुलाम कादर ह्यालाही महादजी शिंदेही यातनामय मरण देऊन त्या चांडाळाचा निर्वंश केला होता. रियासतकार सरदेसाईंनी मराठ्यांच्या इतिहासात महादजींची तुलना नेपोलियनशी केली आहे यावरून महादजींच्या शौर्याची कल्पना यावी.
महादजी शिंदे हेही पानिपत मोहिमेच्या वेळी भाऊसाहेबांबरोबर दक्षिणेंतून निघाले होते. पानपतांत युद्धाच्या शेवटच्या दिवशीं जेव्हां उरलेले लोक पळाले, तेव्हां हेही परत फिरले. परतीच्या वाटेंवर त्यांच्यावर पठाणांच्या एका शस्त्रसज्ज टोळीने हल्ला चढवला, त्यातीलच एका पठाणानें त्याला डाव्या पायावर सांग मारून त्यांचा पाय कायमचा अधू केला होता. राणाखान नांवाच्या एका मराठ्यांच्याच लष्करांतील माणसानें त्याला पुढे निभाऊन आणलें. त्याबद्दल खानास महादजीनें भाऊ मानून व पुष्कळ इनामें देऊन योग्यतेस चढविलें. राघोबादादांच्या घालमेलीच्या कारकीर्दीत महादजी हे पटवर्धन, प्रतिनिधीप्रमाणें निजामाकडे जाऊन मिळण्याच्या बेतांत होता. बारभाईच्या कारस्थानांत कोणास जाऊन मिळावें याबद्दल प्रथम महादजीचा निश्र्चय झाला नव्हता; परंतु नाना व बापू यांनीं शेवटीं त्याना मुलूख वगैरे देऊन आपल्या बाजूस घेऊन त्यांच्याकडूनच राघोबाचा बंदोबस्त केला. मात्र या वेळेपासून महादजींच्या मनांत नाना फडणविसाबद्दल असूया उत्पन्न झाली. या सुमारासच भाऊसाहेबांच्या तोतयाच्या प्रकरणांत महादजींनी कारभाऱ्यांस मदत केली व कोल्हापुरकरांचा पराभव केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!
मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...
.jpg)
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...
No comments:
Post a Comment