विनोद जाधव एक संग्राहक

Monday 29 May 2023

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .भाग ४

 

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .
लेखन ::आशिष माळी


भाग ४
खानजदाखना या प्रकारची माहिती कळली.हातास मिळतील तेवढे स्वार घेऊन कासीम खानाच्या मदतीस धावला
समकालीन साकी मुस्तैदखान लिहितो " मराठ्यांच्याकडे अनेक घोडेस्वार होते "त्यांच्याकडे पायदळात अनेक बंदूक धारक होते . युद्ध तुंबळ झाले . पण मराठे एक पाऊलही हटले नाही . सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत युद्ध चालले.
हे चालू असताना मराठ्यांच्या तिसरी तुकडीने मुघलांच्या छावणी वर हल्ला केला . आता कासीम खान खान जादखान तहाच्या गोष्टी करू लागले . जवळच्या दोद्देरी मध्ये आश्रय घ्यायचा ठरला. पण मराठे त्यांच्या मागे धावू लागले पण इतक्या लोकांसाठी अन्न पाणी नव्हते म्हणून मुघल किल्लेदार नि कासीम खान ला किल्ल्यावर घ्यायला नकार दिला . तट जवळ येऊन मुघलांनी मराठ्या बरोबर युद्धची तयारी चालू केले . सरदारांना अन्न कसे बसे मिळाले पण सामान्य मुघल सैनिकांना अन्न पाणी मिळत नव्हते . मराठ्यांनी सुद्धा मुघलांना कोंडले पण युद्ध चालू नाही केले .
३ दिवस असा कोंडमारा केला . खाफी खानाने मुघलांच्या हालापेष्टाचे वर्णन केले आहे . यावेळी औरंग्याने हिमतखानाला पाठवले . पण संताजीने अर्धे सैनिक वेढ्यात ठेवून उरलेले अर्धे सैन्य घेऊन हिमतखानाकडे वळले . पण वाटेत राजाराम महाराजांनी हिमतखाना फौज पाठवली कळले मग संताजी पुन्हा दोद्देरी ला आले . चित्रदुर्ग चा बारमाप्पा नायक कासिमखानाचा शत्रू होता तो संताजीस फौज घेऊन मिळाला
त्याचवेळी मुघल प्रमुख सरदारांनी नि गढी मध्ये प्रवेश मिळवला त्यामुळे गढी बाहेर असलेल्या सैनिकांचे हाल झाले . कासीमखान आणि इतर सरदार च भांडण झाले ,आणि परिणाम कासीमखान ने आत्महत्या केली . मोठा पराजय आणि अफूचे व्यसन याने कासीमखान संपला. मराठ्यांनी त्वेषाने हल्ला चढवला . खानजादाखान ने सात लाख वसूल केले .
पण इथे दिलदार पनाचे कौतुक करताना खाफीखान ने लिहूं ठेवले आहे . शरणागती पत्करल्यावर कोणत्याही नाही . उलट मुघलांना अन्नदान केले .
संदर्भ
मराठ्यांचे स्वतंत्रयुद्ध (तारिखे खाफीखान पृष्ठ ६१पासून )
मराठे व औरंगझेब (मसूर आलामगिरी) पृष्ठ ६२, ३१

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...