विनोद जाधव एक संग्राहक

Monday 29 May 2023

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई भाग ३

 

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .
लेखन ::आशिष माळी



भाग ३
आता उद्यापासून युद्धभूमी कडे प्रवास म्हणून मुघलांचे सैन्य झोपे गेले.पेशंखाना मध्ये संरक्षणासाठी दीड हजार सैनिक होते.
याचवेळी सावध सेनापती संताजीने व्यूह रचना आखली . त्याने फौजेचे ३ तुकडे केले .पहिल्या तुकडीने खजिन्यावर हल्ला करायचा . खजिना वाचवायला मेजवानी खाऊन झोपलेले कासीमखान , खानजादखान पुढे येतील . मग दुसऱ्या तुकडीने हल्ला करायचा . लढाई रंगात आली कि तिसऱ्या तुकडीने मागून हल्ला करायचा .
त्याच रात्री विठोजी चव्हाण आणि मकाजी देवकाते यांनी 5000 मावळ्यासाहित पेशंखाना वर हल्ला केला.साखरझोपेत असलेल्या मुघलांना मोठा तडाखा होता. मराठ्यांनी जाताना तंबू इतर गोष्टींना आग लावल्या.काही चीज वस्तू घेऊन फरार झाला.कासीम खान सुद्धा नावाजलेला सेनानी होता .औरंग्याने त्याला "गझनफर गाझी" उपाधी दिलेली.खानजादा खान ला खुश करून खिलाफत आणि मान मरातब ची स्वप्ने पाहणारा कासीम आता 6000 फौज घेऊन मराठ्यांच्या पाठीमागे दौडू लागला.त्यापाठोपाठ 2000 ची आणखी 1 तुकडी कासीम खान च्या मदतीस धावली.
पण मराठ्यांच्या एक मोठ्या व्यूह रचनेत आपण फसतोय याचा कोणालाच गंध नव्हता.एक डोंगरा जवळ मराठ्यांनी पळवून आणलेले तंबू जाळून आग निर्माण झालेली.पण अचानक डोंगर आडून संताजी हणमंतराव धोंड आणि हणमंतराव निंबाळकर सहित एक मोठी (दुसरी ) तुकडी घेऊन कासीम खान च्या दोन्ही बाजूने हल्ला केला.पहाटेचे युद्ध दुपार पर्याय चालले होते.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...