विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 27 September 2023

तिमाजी खंडेरावाच्या निवाड्यासाठी महाराजांनी पुण्यात गोतसभा भरवली

 

तिमाजी खंडेरावाच्या निवाड्यासाठी महाराजांनी पुण्यात गोतसभा भरवली
२८ सप्टेंबर १६५७ (आश्विन शुद्ध प्रतिपदा, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, सोमवार)
तिमाजी खंडेराव हा सुपे परगण्यातील मौजे कोल्हाळ येथील रहिवासी होता अन् कुलकर्णीदेखील होता. सुमारे ३५ वर्षांपूर्वी दुष्काळात रखमाजी व अंताजी उंडे पणदरकर यांची कोल्हाळ येथील कुलकर्ण व ज्योतिषवृत्ती २० होनास तिमाजीने विकत घेतली. कारण दुष्काळामुळे उंडे बंधू अन्नपाण्याविना मरणासन्न झाले होते. त्यामुळे गावचे पाटील लुखोजी यांच्या सल्ल्यावरून स्वेच्छेने उंडे बंधूंनी २० होनास आपले कुलकर्णपद तिमाजीस विकले!
साधारणत: ३५ वर्षांनी उंडे बंधू मृत्यू पावल्यावर रखमाजी उंडेंचे पुत्र विसाजी व रामाजी १६५५ साली संभाजी मोहिते मामांच्याकडे जाऊन त्यांना १ घोडी व १७४ रुपये लाच देऊन, मौजे कोल्हाळ येथील कुलकर्ण वतन तिमाजीकडून परत देववण्यासाठी; म्हाताच्या चिमाजीस चामडी लोळेपर्यंत मारवला... मोहिते मामांनी तर तिमाजीची पाठ अक्षरश: सोलून काढली. आणि जबरदस्तीने कुलकर्ण वतन हिसकावून घेतले... पुढे हा तिमाजी कर्नाटकात शहाजी राजांकडे गेला... आणि तिमाजीच्या अन्यायाची कहाणी ऐकून सुपे परगण्याच्या देशमुखांना ७ डिसेंबर १६५५ रोजी पत्र पाठवून न्यायमनसुभा करण्याची आज्ञा केली! सदर पत्र घेऊन तिमाजी परतला असता तोवर शिवाजी महाराजांनी संभाजी मोहितेंना अटक करून उचलबांगडी केल्याचे त्याला समजले. त्यानंतर तिमाजीने सदर शहाजीराजांचे पत्र शिवाजी महराजांना दाखवले...
शिवरायांनीही २८ सप्टेंबर १६५७ रोजी गोतसभा बोलावली आणि या गोतसभेत उंडे बंधूंसह तिमाजीस बोलावून, शिवरायांनी आणि गोतसभेने सर्वांचे म्हणणे ऐकून शिवाजी महाराजांनी स्पष्ट निर्णय दिला की “३५ वर्षांपूर्वी जर तिमाजी खंडेरायाने २० होन दिले नसते तर तुमचे कुटुंब दुष्काळातून वाचले नसते... यावर बोभाटा न करणे... अशा प्रकारे महाराजांनी तिमाजीस न्याय मिळवून दिला. तिमाजी प्रकरणावरून मोहितेमामांच्या कारभारावर जसा प्रकाश पडतो तसाच शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्वही निखालसपणे डोळ्यासमोर येते! अन्यायाची चीड, डोळस व्यवहारी धोरण. दुर्जनांना जरब बसेल असे व्यक्तिमत्त्व राजांनी स्वराज्यात निर्माण केले होते!

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...