विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 27 September 2023

देवास मोठ्या पातीचे तिसरे राजे सेनासप्तसहस्री #श्रीमंत_तुकोजीराव_पवार_महाराज (द्वितीय)

 


देवास मोठ्या पातीचे तिसरे राजे सेनासप्तसहस्री #श्रीमंत_तुकोजीराव_पवार_महाराज (द्वितीय)

1795 च्या खर्ड्याच्या लढाईत निजामाला मराठ्यांनी गुडघे टेकायला लावले, या लढाईत निजामाच्या फौजेचा मोड करणाऱ्या आघाडीवर एक कोवळा मराठा वीर ज्याचे वय होते फक्त अकरा वर्ष... दौलतराव शिंदे यांच्या लष्करातील जिवबादादा बक्षी यांच्याबरोबर आघाडीवर जाऊन अतुलनीय पराक्रम गाजवला होता आणि निजामाच्या सैन्याला आपल्या तलवारीचे पाणी पाजले होते त्या वीर अभिमन्यू चे नाव होते सेनासप्तसहस्री श्रीमंत तुकोजीराव पवार महाराज (द्वितीय) .....
देवासचे दुसरे राजे श्रीमंत कृष्णाजीराव पवार महाराज यांनी त्यांना अपत्य नसल्याने रानोजीराव पवार (विश्वासराव) यांचे पुत्र विठ्ठलराव यांना दत्तक घेऊन त्यांचे नाव तुकोजीराव पवार असे ठेवले.
श्रीमंत तुकोजीराव यांनी आपल्या उभ्या आयुष्यात महादजी शिंदे बरोबर अनेक लढायांमध्ये पराक्रम गाजवला.अठराव्या शतकात मराठेशाहीचे वर्चस्व कमी होण्यास सुरुवात झाली, तेव्हा तुकोजीराव महाजांवर अनेक संकटे आली , पेंढार्यांनी त्यांच्या मुलखात उपद्रव करणू सुरू केले होते .तसेच जयसिंग राजा खेचीने ग्वाल्हेर प्रांतात बंड उभारून मुलखात लुटालूट जाळपोळ केली सुरू केली होती. तेव्हा शिंदे यांच्या फौजी ची लढाई होऊन त्यात शिंदेच्या फौजेचा पराभव झाला ,हे एकूण तुकोजीराव महाराजांनी खेचीवर हल्ला करून त्याला पळवून लावले.
पुढे अठराशे अठरा मध्ये इंग्रजांशी तह झाल्यानंतर श्रीमंत तुकोजीराव यांनी आपल्या प्रजेच्या सुखसोयींकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. राज्याचा मुलुख उद्ध्वस्त झाल्यामुळे लोक गाव सोडून गेली होती . त्यांना दिलासा देऊन खेड्यांमध्ये पुन्हा लोकवस्ती वाढवली संस्थानचे उत्पन्न वाढवले. देवासामध्ये जुन्या राजवाड्यातील जामदारखान्याच्या भाग बांधला .
मराठेशाहीच्या चढत्या काळात पराक्रमी , दृढनिश्चयी व धोरणि असलेल्या तुकोजीराव महाराजांनी मराठेशाहीच्या रक्षणासाठी व विस्तारासाठी पठाण, राजपूत व निजाम वगैरे शत्रूंना टक्कर देऊन विजय मिळविला तर पुढे मराठ्यांच्या पडत्या काळात देखील त्यांनी त्यांचा संयम ढळू न देता मोठ्या धैर्याने पेंढारी व बंडखोरांचे परीपात्य करण्याचे प्रयत्न कायम सुरू ठेवले होते.
तुकोजीराव महाराजांवर सुरुवातीपासून जितकी संकटे आली की पूर्वी त्यांच्या घराण्यातील कोणाच्याच वाट्याला आली नव्हती.
तुकोजीराव महाराजां ची तीन लग्ने झाली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रमाबाई असून दुसऱ्या पत्नीचे नाव सावित्रीबाई होते सावित्रीबाई ह्या संगमनेरकर यांच्या घराण्यातील होत्या आणि तिसऱ्या पत्नी भवानीबाई हे होत्या , खानदेशातील चाळीसगाव येथील राजाजीराव देशमुख यांच्या त्या कन्या होत्या. तुकोजीराव महाराजांना फक्त भवानीबाई पासूनच अपत्ये झाली , दोन पुत्र व तीन कन्या अशी एकंदर पाच अपत्ये झाली होती.
अशा या पराक्रमी,दृढनिश्चयी, धोरणी व संयमी महाराजांचे दिनांक 28 सप्टेंबर 1827 मध्ये देवास येथे निधन झाले.
आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !!
महेश पवार
7350288953

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...