विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 14 January 2025

*श्रीमंत राजे अमरसिंह उर्फ बाबासाहेब शंभुसिह जाधवराव (पहिले )*

 पानिपत शौर्यदिन



*श्रीमंत राजे अमरसिंह उर्फ बाबासाहेब शंभुसिह जाधवराव (पहिले )*

राजे अमरसिंह उर्फ बाबासाहेब हे माळेगाव गादीचे संस्थापक श्रीमंत *राजे शंभुसिंह ( व्दितीय ) धनाजीराव जाधवराव* यांचे कनिष्ठ पुत्र होते जेष्ठ पुत्र राजे *रायसिंगराव* हे माळेगावचा कारभार पाहत असत आणि कनिष्ठ पुत्र राजे अमरसिंह हे त्याचे वडील शंभुसिंह यांच्या सोबत सहाय्यक म्हणुन युध्दात सहभागी होत असत . .घराण्यातील अमरसिंह कर्ते पुरुष होते. त्याचे आणि पेशव्याचे सख्य नव्हते शेवटी नाईलाजाने आपल्या स्वाराचे पथक घेऊन अमरसिंह चाकरीत रुजु झाले . *राजेअमरसिंह उर्फ बाबासाहेब हे सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांचे नातु होते* त्यावेळी सातारच्या छत्रपती ची सत्ता नामधारी होऊन सर्व सत्ता पेशव्याच्या हातात गेली होती. बाळाजी बाजीराव पेशवे यांनी श्रीमंत सकवारबाईसाहेबाना सती जाण्यास भाग पाडुन छत्रपती राजाराममहाराजाना गादीवर बसविले .आणि सर्व मराठी राज्याची सत्ता आपल्या हाती घेतली .अमरसिंह यांना आपली कर्तबगारी दाखविण्यस पेशवे दरबाराखेरीज जागा पण उरली नव्हती .आणि ते पेशव्याचे,अंकीत झाले उदगीर, सिंदखेडचे लढाईत युध्दात सहभागी होऊन पेशव्याना.विजय संपादन करुन दिला , युध्दात त्यांनी दाखविलेली कर्तबगारी ही डोळ्यात भरण्यासारखी होती इतके नव्हे तर पेशव्याची मर्जी संपादन केली . १७६१ च्या पानिपत स्वारीवर ते सदाशिवभाऊबरोबर त्यांचे वडील शंभुसिंह यांना न विचारता ते पानिपतच्या युध्दासाठी गेले आपण गेलेलो आपल्या वडीलाना दरबार मंडळीनी कळवु नये असे अमरसिंह सांगुन ठेवलेले पण हुजरे लोकाकडुन ही बातमी शंभुसिंहाना कळाली . आपल्या मुलाने पानिपत स्वारीवर जाऊ नये आशी त्यांची इच्छा होती .कारण शंभुसिंह फारच वृध्द झाले होते आणि आजारी होते आपला मुलगा आपल्याजवळ असावा असे वाटत होते त्यामुळे सदाशिवभाऊ पत्र पाठवुन अमरसिंहाना परत पाठविण्यासंबधी लिहले हे पत्र सदाशिभाऊना *सिंरोजा* या ठिकाणी मिळाले .सदाशिवभाऊनी पण उत्तरादाखल लिहलेल्या पत्रात असे लिहले *" पानिपतच्या स्वारीत अमरसिंहासारखे नामांकित असणे जरुरीचे आहे "* ह्यावरुन अमरसिंहाचे लष्करी क्षेत्रातील कार्य सहज लक्षात येते .सदाशिवराव भाऊची स्वारी ५०००० सैन्य आणि ६ लक्ष रुपये अश्या ताकदीसह मराठ्याचे सैन्य आणि बरोबर हजारो यात्रेकरू, व्यापारी, कुटुंबे पण होती दिल्लीच्या वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड , बुंदेले पण सामील झाले लाल किल्ला ताब्यात घेतला १४ जानेवारी १७६१ ला अफगणीस्थानचा अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपत येथे तुंबळ युध्द झाले त्यात अनेक मराठे धारातिर्थी पडले तिकडे मराठ्याकडे थंडीपासुन रक्षण करण्यासाठीचे पुरेशे कपडे नव्हते तर अफगाण सैन्याकडे कडे चांबङ्यापासुन बनविलेले कपडे होते मराठ्यांना गणिमी काव्याचे युध्दात युध्दात तरबेज होते पण पानिपत मैदानी युध्द होते कित्तेक दिवस अन्नाचा कणदेखिल नव्हता मराठ्याचे सैन्य तरी लढत होते . तिकडे माळेगावी त्यांचे वडीलाची तब्येत दिवसेदिवस बिघडत चाललेली अखेरच्या समयी तरी मुलगा जवळ असावा असे वाटत होतेअसे अखेर शंभुसिंह मृत्यु पावले मृत्यु समयी त्यांना उपस्थीत राहाता आले नाही स्वामीनिष्ठेला प्राधान्य दिले इकडे युध्दात *विश्वासराव* पेशवे ठार होऊन अंबारीखाली पडले त्यावेळी त्यांचा हत्ती गिलच्यांच्या फौजेने अडवुन अब्दालीने आपल्या ताब्यात घेतला . अमरसिंहाने उदगीर गोसाव्याचे सहाय्य घेऊन आपल्या फौजेसह पर्वा न करता गिलच्यांवर हल्ला केला आणि विश्वासरावाचे प्रेत अंबारीच्या हत्तीसह ताब्यात घेतले , सदाशिवभाऊ पण अंबारीतुन उतरुन घौड्यावर बसुन सैन्याशी दोन केले आणि सदाशिवराव गर्दीत नाहीशे झाले *सदाशिवराव विश्वासराव इब्राहीम खान,यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे धाराततिर्थी पडले*'थोडाक्यात सांगायाचे झाले तर,असे *दोन मोती सत्तावीस मोहरे आणि असंख्य चिल्लर खुर्ता यांची गणतीच नाही लाखो बांगड्या फुटल्या* .मराठ्याच्या सैन्या बरोबर चाळीस हजार यात्रेकरु , व्यापारी , कुटुंबे तसेच ही पण धारातिर्थी पडली बावीस हजार सैन्याला युध्दकैदी बनविले *पानिपतयुध्द* हे *मराठे हरले नव्हे तर मरे पर्यत जिकंले हेच सांगुन गेले* नंतर *विश्वासरावाचे* प्रेत हिंदुशास्त्राप्रमाणे त्यास दहन करण्याची तजबीज उत्तमसिंग गोसावीकडुन पानिपत येथेच केली पानिपत युध्दात मराठ्याचा पराभव झाला .अमरसिंहाना पण माघार घ्यावी लागली *अमरसिंहानी एका गोसाव्याचे सोंग धारण करुन पेशव्याच्या स्त्रीयाचे संरक्षण केले* सदाशिवरावाची पत्नी पार्वातीबाई आणि इतर स्त्रीना मल्हारराव होळकराच्या मदतीने नानासाहेबाकडे नर्मदेकाठी सोपविले नंतर सर्वजण पुण्यात दाखल झाले *नंतर अमरसिंह हे माळेगावी आले त्यांनी आपल्या वडीलाची उत्तरक्रीया विधी पार पाडले* आणि वडीलांची समाधी बांधली . तिकडे नानासाहेब पेशवे पर्वती येथे मरण पावले. *पानिपत युध्दाचा वृत्तांत बारामती येथील सोनवडी गावच्या पाटील कादर साहेब यांना सांगितला त्यावर त्यांनी पोवाडा लिहला* . पानिपतच्या स्वारीवर जाण्यापुर्वी पेशव्यांनी ज्या ज्या सरदारावर अन्याय केले होते त्यांनी " आणि त्यांनी पानिपतच्यायुध्दात मदत करावी ज्यांचे ज्यांचे सरंजाम आणि जहागिर खालसा केली त्यांना परत देण्याचे अभिवचन दिले होते परंतु *पेशव्यानी मराठ्याना दिलेले आश्वासन पाळले नाही उलट त्यांनी कृतघ्न होऊन माळेगाव जहागिरीचे पुष्कळ उत्पन्न कमी केले* त्यामुळे अमरसिंह पुर्ण भ्रमनिराश झाले पण *फितुरी नाही केली ते शेवटपर्यत स्वामीनिष्ठच राहिले* .*सदर माहिती share कराताना कसलेही Editing करु नये अथवा कसलाही फेरफार करु नये जशी आहे तरी share करावी .

श्रीमंत राजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव मो.नं. 9767345333
*जय जिजाऊ जय शिवराय

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...