होय आमच्या मुळे आजचा हिंदुस्तान आहे....!!
शक्य होतं आम्हाला नर्मदेच्या अल्याड आईने महाल बांधून गाद्या गिर्द्यांवर लोळणं....
जेव्हा राजपूतान्यातले नावाचे सिंह डरकाळी फोडायला धजावत नव्हते..तेव्हा ओठ पिळले तर दुध निघेल अश्या वयातली आमची पोरं निधड्या छातीने गिलच्यांना भिडली.....!!
ज्याच्या नावाने देशीदेशीच्या सीमा थरथर कापायच्या त्या अब्दालीला मृत्युला भयभित करणार मराठी तांडव आम्ही दाखलय....!!
होय...आम्ही मरण मारून पुढे निघालो....आम्ही मरणाला शिकस्त दिली....उभ्या हिंदुस्तानात महाराष्ट्राला राष्ट्रीयत्व शिकवावं लागत नाही...कारण पाहिजे असेल तर पानिपतावरच्या मातीला प्रश्न करा...!! तिथल्या रणमैदानात उठलेल्या वावटळींवर आजही हर हर महादेव चा रणघोष ऐकू येतो ......!!
आमच्या वर्तमानच्या वागणुकीचा शिलालेख आमच्या बापजाद्यांनी हिंदुस्तानच्या सीमेवर रक्ताने कोरला आहे.....!!
सचिन शिवाजीराव खोपडे
No comments:
Post a Comment