विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 November 2025

सवाई माधवराव

 रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६-६।। च्या सुमाराला वाताच्या झटक्यात ( हिस्टेरिया ) शनिवारवाड्यातील गणेश महालाच्या वरच्या मज-त्यावरील स्वतःच्या दिवाणखान्याच्या सज्जातून (बाल्कनी) माधवराव तोल जाऊन खाली कारंजाच्या कठड्यावर पडले. उजव्या मांडीला मोठी जखम झाली. अस्थीभंग झाला. जबड्याच्या उजव्या बाजूला मार लागून दाताची कवळी बाहेर निघाली. नाकावाटे रक्त वाहू लागले,

अपघाताची बातमी समजताच नाना फडणीसांनी तातडीने येऊन माधवरावांना आरसे महालात आणवले. वैद्य व हबीब (अस्थी तज्ञ) बोलावून ताबडतोब उपचार केले. पण काहीही उपयोग न होऊन, मंगळवारी २७ ऑक्टोबर सन १७९५ रोजी संध्याकाळी ७ च्या सुमाराला (राक्षस-नाम संवत्सर, अश्विन शु. १४ शके १७१७) माधवरावांचा १५८ अपघाती अंत झाला. *
त्याचबरोबर नाना फडणीसांनी 'शर्थीने राज्य राखण्यासाठी' २३ वर्षे केलेले प्रयत्न वाया गेले. 'श्रीमंत आमरणांत बोलत होते. बोलून चालून राजश्री नानास सांगितले. 'आमची वेळ जवळ आली. आम्हास राज्याची इच्छा नाही. तुम्ही आमचे नावाचा दुसरा करणे. आपण सूर्यमंडळ भेद करून जातो.

सवाई माधवरावांच्या मृत्यूबद्दल इंग्रज वकील युथाप म्हणतात : १६० "The death of the Peshwa in consequence of a fall from an upper appartment.' जास्त चौकशी केल्यानंतर युथाप म्हणतो: 'The Peshwa in a temporary fit of delirum or derrangement jumped or fell from an upper room or terrace into a fountain below.' 'सवाई माधव-रावाने गणपतीचे दिवाणखान्याचे दुसऱ्या मजल्यावरून दक्षिणेकडे कारंजांचे हौदात उडी टाकली.
हा दिवाणखाना पूर्व बुरुजाजवळ आहे, तर हजारी कारंजे पश्चिम भागात आहे यावरून सवाई माधवरावांनी उडी टाकली ती हजारी कारंजावर नव्हे, तर आठ कारंजाचे हौदावर. ६ जानेवारी १८०६ ला सवाई माधवरावांच्या अस्थी प्रयागला पाठवल्या.

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...