असामान्य कल्पकता ।।
शिवरायांच्या वैचारिक प्रज्ञेचा “असामान्य कल्पकता” हा मुख्य पैलू होता. परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल असो त्यांच्या व्यक्तिमत्वातील अष्टपैलू गुण नेहमी दिसून येत असतं. शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थाने यांना शिवरायांनी कधीही थारा दिला नाही. याउलट आपल्याच जाळ्यात शत्रुला पकडण्यात ते यशस्वी होत असत. आग्र्याला गेल्यावर ज्यावेळी त्यांना नजरकैदेत ठेवले गेले त्यावेळी त्यांची असामान्य कल्पकता आपल्याला पहावयास मिळते. औरंगजेबाच्या कपटाला आणि कारस्थानाला दाद न देता अगदी यशस्वीरित्या शिवराय तिथून निसटले आणि औरंगजेबाला त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या पराभवाचे दर्शन घडवून दिले. सदैव जागृत असणे, गाफील न राहणे, नेहमी आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणे अशा गुणांमधून शिवरायांचे अद्वितीय अष्टावधान दिसून येते...!
डग्लस म्हणतो, “एखादे शिकारीचे सावज जसे सदैव जागरूक आणि सावधान असते तसा शिवाजीराजा सतत कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यायला सदैव सज्ज असे. या संदर्भात जे राजाच्या लहानशा बोटांत होते ते औरंगजेबाच्या संपूर्ण देहात नव्हते. एक डोळा सदैव उघडा असल्याप्रमाणे त्यांची झोप सावध असे...”
धाडसाच्या बाबतीत ऑर्मची साक्ष अर्थपूर्ण आहे. तो म्हणतो, “एका हातात नागवी तलवार घेऊन घोडदौड करीत शिवाजीराजा शत्रूच्या प्रदेशावर चालून जात असल्याचा प्रसंग आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचे त्याचे सैनिक इतरांना अभिमानाने सांगत असत...”
: पराक्रमापलीकडले शिवराय.

No comments:
Post a Comment