विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 July 2019

व्यापार नेहमी प्रगतीच्या वाटेवर रहायला पाहिजे - राजर्षी शाहू महाराज


व्यापार नेहमी प्रगतीच्या वाटेवर रहायला पाहिजे - राजर्षी शाहू महाराज
आर्थिक सुबत्तेसाठी व्यापारउदीम वाढला पाहिजे आणि त्यासाठीच खास प्रयत्न केले पाहिजेत , अशी शाहू महाराजांनी भूमिका होती. राजर्षी शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूर संस्थानात उद्योगधंद्यातून किंवा कारखान्यांमधून तयार होत असलेल्या मालाच्या व्यापाराचा प्रश्न महत्वाचा नव्हता कारण त्या प्रकारच्या मालाचे उत्पादन अतिमर्यादित होते. परंतु शेती उत्पन्न वस्तूंच्या व्यापाराचा प्रश्न निश्चितच होता.
कोल्हापूरच्या व्यापारपेठेचे जनकत्वसुद्धा राजर्षी शाहू महाराजांकडेच होते.त्यांच्या काळात तुलनात्मकदृष्ट्या निपाणी येथे व्यापार जास्त चालत असणार.राजर्षी शाहू महाराजांनी निपणीच्या व्यापाऱ्यांना कागल येथे बोलवून घेतले आणि त्यांच्याशी कोल्हापूर शहरात व्यापारपेठ बसविण्यासंबंधी विचारविनिमय केला.ह्या व्यापारात त्या लोकांना राजर्षी शाहूंनी अनेक सवलती देऊ केल्यात. ह्यावर सन १८९५ साली शाहूपुरी व्यापारपेठ स्थापन झाली आणि ह्या पेठेत व्यापारपेढ्या काढणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठमोठ्या आकाराचे प्लॉटस् मोफत देण्यात आले.
आता ही व्यापारपेठ जुन्या कोल्हापूर शहरापासून दूरवर ओढ्याच्या पूर्वेस आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ वसली गेली.हा व्यापारा बद्दल दृष्तुकोन खरच महत्वाचा , शहर विस्ताराच्या क्रमात आज ही पेठही शहराच्या मध्यवस्तीत आली आणि रेल्वे स्टेशनही गावात ,भर वस्तीत आले.शहरापासून राजर्षी शाहू महाराजांनी व्यापारपेठ दूर वसवली होती म्हणून पोस्ट खात्यास विनंती करून तिथे पोस्टाची व तारा करण्याची सोय करण्यास सांगितले.
कोल्हापूर फक्त शहरापुरते न पाहता आर्थिक विकेंद्रीकरण करण्याचा दृष्टिकोन ठेवून राजर्षी शाहूंनी जयसिंगपूर व गडहिंग्लज मधे पण व्यापारास उत्तेजन दिले.म्हणून त्या भागात गूळ , मिरची, भुईमूग यांची व्यापारपेठ तयार झाली.कोल्हापुरात शेती उत्पन्नाचा मुख्य माल म्हणजे गूळ आणि आज देशभर कोल्हापुरातील गूळ प्रसिद्द झालाय. राजर्षी शाहूंच्या काळापूर्वी तसा कोल्हापुरी गूळ प्रसिद्द न्हवता. या भागातील गुळाची व्यापारपेठ म्हणजे कोकणातली राजापूरची व्यापारपेठ प्रसिद्द होती. राजर्षी शाहूंनी तसाच कोल्हापुरी गूळ पण प्रसिद्द केला आणि या सर्व प्रयत्नांचे सुपरिणाम दिसणे भागच होते. कारण संस्थानाबाहेर होणाऱ्या शेती मालाच्या निर्यातीच्या आकड्यात हे परिणाम दिसतात.सन १८९४-९५ साली ही निर्यात जेमतेम ६,००,००० रुपये झाली , आणि तीच १९२१ साली ३०,००,००० रुपये झाली म्हणजेच ५ पट वाढ. ह्या बाबतीत व्यापारवृद्दीसाठी असे प्रयत्न केलेले संस्थानिक इतर कुणी फारसे दिसत नाहीत.
लोकराजे छत्रपति राजर्षी शाहू महाराज

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...