विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 March 2020

होळकर आणि शिंदे सरदार यांचे आपसात वितुष्ट

होळकर आणि शिंदे सरदार यांचे आपसात वितुष्ट कोणत्या कारणांमुळे आले होते? त्यांच्या एकमेकांशी लढाया झाल्यात का?
saambhar :Ashish Mali, रासायनिक अभियंता

मराठेशाहीची खंदे समर्थक महादजी शिंदे , तुकोजी होळकर , अहिल्याबाई १७९४-१७९६ या दोन ते तीन वर्षात मरण पावले आणि तिथून होळकर शिंदे ची भांडणे पूर्ण टोकावर जाईल इतकी वाढली, आणि मराठेशाहीला शेवटची घरघर लागली.
नाना फडणवीस च्या मृत्यूनंतर (१८००) दुसरा बाजीराव कडे सत्ता आली . ते दौलतराव शिंदे च्या पूर्ण आहारी गेले आणि विठोजी होळकर ला हत्ती च्या पायी दिले . यशवंतराव होळकर नंतर पुणे लुटले . यशवंतरवानी शिंदे -होळकर एकत्र यावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली . शिंदे होळकर मध्ये नावापुरती दिलजमाई झाली पण युद्धात नाही . नंतर इंग्रजांशी स्वतंत्र करार करून नाममात्र सरदार म्हणून आणि मोठ्या हवेली बांधून इंग्रजांचे आयुष्याभर दास झाले .
📷
मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे हे बाजीरावचे दोन्ही खास सरदार.होळकरांना माहेश्वरी आणि शिंदे ना ग्वाल्हेर ला कायमस्वरूपी ठेवून स्वराज्याच मुघल वर, आणि राजस्थान वर कायमच वचक ठेवला.शिंदे होळकर आणि पवार याना सैन्याचा खर्च भागवण्यासाठी मध्य प्रदेश मधील सुपीक माळवा हा प्रांत देण्यात आला . उदाजी पवार यांनी सवाई माधवसिंग च्या युद्धात पेशव्याचे एक सरदार कुसजी गणेश याना मदत न करता शिंदे होळकर या विर्रुद्ध सवाई माधवसिंग ला मदत केल्यामुळे , पवार ना धार चा भाग देण्यात आला जो आकाराने कमी होता .
मराठयानी मुघल द्वारे, राजपूत द्वारे, राजस्थान, हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बंगाल पर्यंतच चौथाईचा हक्क आपल्या कडे ठेवला.आणि होळकरांची आणि शिंदे नची दुहीची बीजे इथेच चौथी च्य हक्कात रोवली आहे.१७३८ भोपाळच्या युद्ध निझामाला हरवल्यावर नंतरमाळवा चे हक्क शिंदे होळकर या कडे आले
पाहिले बाजीराव 1740 ला आणि राणोजी शिंदें 1745 ला मरण पावले.नंतर जयाजीआपा कडे ग्वाल्हेरच्या कारभार आला.
  1. राणोजी शिंदे आणि मल्हार यांच्यात प्रथम फरक १७३५ मध्ये जेव्हा राणोजी महिन्याभरात चिमणजी आप्पा यांना दोनदा तक्रार केलेली कि मल्हारराव होळकर मैदानात उशीर केला होता . मल्हारची सुस्तपणा मुळे सैन्याचा खर्च वाढत आहे .
  2. जयाप्पा शिंदे ना मल्हार राव होळकर बरोबर जास्त पटत नसल्यामुळे आघाड्या करून युद्ध करताना ते नाराज असायचे . १९५५ ला नागौर च्या युद्धात राठोड कडून जयप्पा याना वीर मरण आले कुंभेरीच्या वेढ्यात मल्हारराव यांचा मुलाचा आणि अहिल्याबाई होळकर यांचा पती खंडेराव हे एका बंदुकीच्या गोळीला शिकारी पडले त्यामुळे जयाप्पाच्या खुनात होळकर वर संशयीची सुई आणि खंडेराव याचा मृत्यनंतर होळकर याना शिंदे विषयी शंका आली.
  3. जयाप्पा शिंदे गेल्यावर दत्ताजीने जयाप्पाच्या मुलाला म्हणजे , जनकोजी शिंदे ला गादीवर बसवले . भोळा भाभडे दत्तोजी शिंदे पेशवे ची प्रत्येक आज्ञा शिरसवंध मानून उत्तर भारतात आणि सध्याच्या पाकिस्तान मध्ये वचक निर्माण केला आणि मल्हारराव ला ईर्षा निर्माण झाली . सर्व शत्रुंना संपवू नका नाहीतर पेशवे आपल्याला धोतरे धुवायला ठेवतील असा अनाहूत सल्ला मल्हारराव यांनी दत्ताजी ना दिला, जो दत्ताजी ने झिडकारला .
  4. मल्हारराव यांनी नजीब ला मानसपुत्र मानला आणि बुराडीच्या युद्धात अब्दाली आणि नजीबद्वारे दत्ताजी शिंदे (राणोजींचा मुलगा ) मारला गेला . त्यात होळकर यांनी वेळकाढूपणा केल्याचे आरोप जयाप्पा शिंदे यांचा मुलाने म्हणजे जनकोजी शिंदे ने केले .
  5. पानिपतात अख्खा शिंदे घराणे संपले फक्त महादजी निघून गेले ते एक पाय अधू होऊन . पण त्यांच्या मनात मल्हारराव यांच्या विषयी अढी राहिली . पुढे मल्हारराव १७६६ ला निधन झाले . पण महादजी नि अहिल्याबाई ला नेहमी योग्य ते मान दिला . तुकोजी होळकर आणि महादजी मध्य विशेष सख्य नसले तरी पानिपतच्या युद्धामुळे त्यांनी दोघांनी समंजस पण दाखवला .
  6. पुढे अहिल्याबाई यांचा आदर जरी महादजी शिंदे यांनी ठेवला पण तुकोजी होळकर आणि महादजी त्या मध्ये इतकसे पटत नसले तरी पानिपतच्या युद्धा नंतर ओढवलेल्या गंभीर प्रश्नासाठी ते एकत्र आले आणि राहिले.
  7. मराठ्या च्या राज्याला घरघर लागली ते दुसऱ्या बाजीराव च्या कारभाराची आणि शिंदे होळकर वादामुळे.त्यावेळी दौलतराव शिंदे (तुकोजी होळकर चा मुलगा) आणि होळकर कुटुंब मध्ये वादविवाद भांडण चालू झाले.
  8. दौलतराव शिंदे ची बायको बायजीबाई शिंदे अतिशय सुंदर .दौलतराव हा तिचे ऐकायचा.ती घाटगे कुटुंबातील आणि त्यामुळे दौलतराव सासर्याचा शब्द ठेवायचा नाही.दुसरा बाजीराव ने नंतर होळकर च्या वर्ष साठी भांडणे लावून दिली.त्यात दुसरा बाजीराव ने विठोजी होळकर ला हत्तीच्या पायाखाली दिले.त्यावेळी यशवंतराव ने पुणे जळाले.यशवंतराव ला इंग्रनज सुद्धा घाबरून असल्याचा .एवढा पार यशवंतराव ने दौलतराव शि तह करण्याचा लरायत्न केला आणि इंग्रज विरुध्द युद्ध पुकारण्याचा .पण तो अयशस्वी झाला.
  9. ४ जुलै १८०१ मध्ये यशवंतराव होळकरांनी उज्जैन मध्ये शिंदे वर हल्ला केला . त्यात शिंदे चे सेनापती जॉन hessing होते . त्यात शिंदे नि ३००० सैनिक गमावले . नंतर पुण्यामध्ये १८०२ होळकरांनी पुन्हा शिंदे ना हरवले त्या नंतर संधीचा प्रयत्न केला .दुसऱ्या मल्हारराव चा मुलगा सोडून द्या काशीराव च्या जागेवर खंडेराव च्या मुलाला मान्यता द्या . अशा अतिशय साधारण मागण्या होत्या . यशवंतरावानी नगर जळगाव नाशिक सिन्नर कुरकुंभ जिंकले जवळपास सारे मराठा राज्य त्याकडे गेले . त्यावेळी हडपसर जवळ शिंदे आणि पेशवा यांच्या फौजेला हरवले . त्यांनतर दुसरा बाजीराव पळून गेला . यशवंतरावीनं त्याला पुण्यामध्ये तरी ते फिरकले नाही . त्यांनतर यशवंतराव नि कोकण घेतला . आणि तिकडे दुसरा बाजीराव यांनी मराठेशाहीतील सर्वात ऐतिहासिक चूक केली . इंग्रज बरोबर वसई चा तह केला.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...