विनोद जाधव एक संग्राहक

Monday 29 May 2023

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .भाग २

 

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .
लेखन ::आशिष माळी



भाग २
१६८९-१६९५ मध्ये संताजी आणि धनाजी यांनी मुघलांना कर्नाटकात पळो की सळो करून ठेवले . स्वतः झुल्फिकारखान राजाराम महाराजांच्या हातातून वाचलेला . ह्याच काळात संताजी नि कर्नाटकातील बेरड लोकांना घेऊन मुघलांना अनेक तडाखे दिले . संताजी घोरपडे जिंजीकडे (औरंग्या सोलापूर दक्षिण बाजूला ब्रम्हपुरी मध्ये होता) त्याने त्यावेळी कर्नाटकातील नावाजलेला सरदार कासीम खानाला संताजी घोरपडे अडवण्यास सांगितले पण संताजीच दरारा होता म्हणून औरंग्याने खानजादा खान सफशिकन खान सय्यद असलात खान , मोहम्मद मोरादखान याना कासीम खान ला मदतीसाठी पाठवले कासीम खान त्यावेळी अधोनी किल्ल्याजवळ मोठा तोफखाना होता .मुघलांच्या दोन्ही फौज चित्रदुर्ग च्या उत्तरेस एकत्र आल्या. संताजी च्या फौजा सहा कोस पुढे होत्या .
दु सऱ्या दिवशी युद्धास तोंड फुटणार होते . त्यामुळे रात्री कासीम खानाने मोठा कार्यक्रम आयोजित केला. खानजादा खान हा नुसता सेनानी नव्हता तर औरंगाय जवळच नातेवाईक होता.
त्यामुळे समारंभात कासीम खानाने कोणतीच कुचराई केली नव्हती.अधोनी वरून निघताना मोठा खजिना कासिमखानाने घेतला होता . त्याने पेशखाना ( खजिना)पुढच्या मुक्कामाला पाठवून दिला.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...